शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कीटकनाशक कंपन्यांची पाठराखण; गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:07 IST

कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होऊन विदर्भात ३४ शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतरही कृषी विभागाने अजून संबंधित कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे नोंदविलेले नाहीत.

मुंबई : कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होऊन विदर्भात ३४ शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतरही कृषी विभागाने अजून संबंधित कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे नोंदविलेले नाहीत. उलट त्यांना चर्चेसाठी आवतण दिले असून, सोमवारी बियाणे व कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात बैठक लावली आहे.कृषी विभागाने केवळ कृषिसेवा केंद्रांच्या विरोधात गुन्हे नोंदवित कंपन्यांची पाठराखण केली आहे. शेतकºयांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे झाले. त्यानंतर, कृषी राज्यमंत्री, कृषिमंत्री, आरोग्यमंत्री, अपर मुख्य सचिव (गृह), कृषी सचिव, कृषी आयुक्त आदींनी सर्वाधिक प्रभावित यवतमाळ जिल्ह्यात भेटी दिल्या. त्यानंतरच्या अहवालात कृषी अधिकाºयांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच शेतकºयांचे बळीचे गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र, वरिष्ठ पातळीवरून केवळ कृषिसेवा केंद्रांवर कारवाई सुरू आहे.वास्तविक, कीटकनाशक कंपन्यांचा हलगर्जीपणा या सर्व प्रकारास कारणीभूत आहे. मात्र, बड्या कंपन्यांना हात लावण्यात कोणी तयार नाही. उलट त्यांना चर्चेसाठी सोमवारी मंत्रालयात बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.बेजबाबदार अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस कृषी विभागाने शुक्रवारी पाठविली आहे. मात्र, यवतमाळच्या किती अधिकाºयांवर कारवाई होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाच जिल्हे प्रभावितफवारणीने यवतमाळसह (१९) नागपूर (५), भंडारा (२), अकोला (५), बुलडाणा (१), अमरावती (२) जिल्ह्यांत शेतकºयांचा मृत्यू झाला, परंतु प्रशासनाने केवळ यवतमाळमधील प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे. इतर जिल्ह्यांत अजून विशेष कारवाई सुरू झालेली नाही.फवारणी मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवा - मुंडेफवारणीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे यवतमाळमध्ये आले होते. ते म्हणाले, जुलै महिन्यापासून यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेचे प्रकार होत आहेत, पण शासनाकडून कुठलीही ठोस कारवाई झाली नाही.या प्रकरणात अद्यापपर्यंत कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. केवळ सचिवांना पाठवून अहवाल मागविण्यात आला आहे. मुख्यमंत्री, कृषिमंत्री विदर्भातील असतानाही शेतकरी जीवानिशी जातोय, याचे कुणालाच सोयरसुतक दिसत नाही. कायदेशीर-बेकायदेशीर कृषी परवानाधारक कीटकनाशक कंपन्यांना शासनाकडून अभय दिलेजात आहे.ज्या शेतकºयांनी कीटकनाशक खरेदी केले, त्याच्या काही पावत्या आमच्याकडे आहेत. त्या आधारावर बनावट औषध कंपन्या, विक्रेते आणि शासकीय यंत्रणेतील दोषी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी विधान भवनात लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी