शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

राज्यात बदली व नियुक्तीचा सुपर बाजार - माजी मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:53 IST

दिवास्वप्न दाखवत भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. दिलेल्या एकाही वचनाची पूर्तता गत तीन वर्षांत झाली नाही. उलट केंद्र व राज्यातील आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे.

यवतमाळ : दिवास्वप्न दाखवत भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. दिलेल्या एकाही वचनाची पूर्तता गत तीन वर्षांत झाली नाही. उलट केंद्र व राज्यातील आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे. पारदर्शकतेचा डांगोरा पिटणा-या सरकारातच बदली आणि नियुक्तीचा सुपर बाजार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त यवतमाळात आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपा सरकारच्या तीन वर्षांच्या सत्ताकाळात शेतकरी, युवक, व्यापारी, अल्पसंख्याक व दलितांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. उद्योगपतींसाठी रिझर्व्ह बँकेचे व्याजदर कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक शेतमालाचे भाव पाडले जात आहेत. मेक इन इंडिया, अ‍ॅडव्हॉन्टेज विदर्भ, मिहानमध्ये एकही उद्योगधंदा आलेला नाही. काँग्रेसचा बुलेट ट्रेनला पूर्णत: विरोध असून, हे अंतर विमानाने तासाभरात गाठता येते, त्यासाठी अनाठायी खर्च करून बुलेट ट्रेन लादली जात आहे. त्यातही तिकिटांचे दर हजारोंच्या घरात राहणार आहेत. केवळ गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी जपानच्या पंतप्रधांनाचा अहमदाबादमध्ये रोड शो घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.डिजिटल अर्थव्यवस्थेतून केवळ बहुराष्टÑीय कंपन्यांनाच मोठा फायदा होणार आहे. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जीएसटीची संकल्पना काँग्रेसची आहे. मात्र, भाजपा ती चुकीच्या पद्धतीने राबवत आहे. त्यामुळे आता व्यापाºयांवरही आत्महत्येची वेळ आली आहे. राज्य विधिमंडळात प्रकाश मेहता, सुभाष देसाई समृद्ध मार्गासाठी नियुक्त केलेले सीईओ मोपलवार, एसआरए प्रकरणातील निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचे अनेक पुरावे मुख्यमंत्र्यांकडे दिले. मात्र, त्यांनी या सर्वांनाच पाठीशी घालण्याचे कंत्राट घेतले आहे. केवळ एकनाथ खडसे अडचणीचे वाटत असल्याने त्यांची न्यायालयीन चौकशी लावण्यात आली. इतरांना मात्र सेवानिवृत्त अधिकाºयांकडूनच चौकशी करून क्लीन चिट दिली जात असल्याचे त्यांनी सांगिंतले.राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मारकांचे केवळ भूमिपूजनावरच काम थांबले. अशीच स्थिती समृद्धी मार्गाची आहे. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा काम करत असून, भपकेबाजपणा सुरू असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार नंदिनी पारवेकर, माजी आमदार विजयाताई धोटे, पक्ष निरीक्षक श्याम उमाळकर, के. के. शुक्ला आदी उपस्थित होते.नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, राणे यांना काँग्रेस पक्षच कळला नाही. कुणाला मंत्री करायचे हा निर्णय मुख्यमंत्री घेत नसतो, तो सर्वानुमते दिल्लीतूनच ठरतो.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार