शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रविवार विशेष मुलाखत : तांत्रिक प्रशिक्षण घेऊन पादाक्रांत करावीत शिखरे : सुरेंद्र चव्हाण         

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 07:00 IST

जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या एव्हरेस्टवर १८ मे १९९८ या दिवशी चव्हाण यांनी भारताचा तिरंगा फडकवला. या अभिमानास्पद रोहणाला एकवीस वर्षे पूर्ण झाली.

काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी गिर्यारोहण केले पाहिजे. गिर्यारोहण हे जोखीमचे काम आहे. आपल्यावर येणाऱ्या जोखमी स्वीकारून त्यावर मात करता यायला हवी. गिर्यारोहणामध्ये अपघात होणे स्वाभाविकच आहे. अपघातांना सामोरे जाऊन यश मिळवणे म्हणजेच गिर्यारोहण होय... - सुरेंद्र चव्हाण   

पुणे : ‘‘आताच्या तरुणाईची विचारसरणी साहसी आहे. आधुनिक युगातील तंत्रज्ञान आणि शैक्षणिक माहितीचा पुरेपूर फायदा त्यांनी करून घ्यायला हवा. भारतात काशी, दार्जिलिंग आदी ठिकाणी गिर्यारोहणाशी निगडित संस्थांचे मुलभूत प्रशिक्षण देणारे ‘कोर्स’ आहेत. यातून तांत्रिक ज्ञान मिळते. पर्वतरांगा, निसर्ग, हवामान अंदाज आणि गिर्यारोहणाशी संबंधित पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. या सर्वाच्या अभ्यासातून तरुणांनी गिर्यारोहणाचे धडे गिरवावेत आणि त्यानंतर सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करावीत,’’ असा सल्ला महाराष्ट्राचे पहिले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांनी दिला.               जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या एव्हरेस्टवर १८ मे १९९८ या दिवशी चव्हाण यांनी भारताचा तिरंगा फडकवला. या अभिमानास्पद रोहणाला एकवीस वर्षे पूर्ण झाली. याच आठवड्यात पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या दहा बहाद्दरांनी जगातील तिसºया क्रमांकाचे सर्वोच्च कांचनजुंगा शिखर सर केले. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. 

एकवीस वर्षांपूर्वीचे गिर्यारोहण आणि सध्याचे गिर्यारोहण यात फरक काय?          दोन दशकांपूर्वी आर्मीचेच लोक गिर्यारोहण करू शकतात, असा भारतीयांचा समज होता. आम्ही माउंट एव्हरेस्टवर जाण्याआधी बंगालच्या टीमने प्रयत्न केले होते. पुण्यातलेही अनेक गट जाऊन आले. पण ते यशस्वी झाले नाहीत. एव्हरेस्ट चढण्याची आमची पहिलीच मोहीम होती. आमचा तेरा जणांचा संघ होता. त्यातले सातजण चढाई करणार होते. सहा जण मदतीसाठी होते. हवामान खात्याने दिलेल्या अचूक अंदाज घेऊन आम्ही चढाई चालू केली. शेरपांचीही मदत होतीच. आता परिस्थिती बदलली आहे. शरीर तंदुरुस्त असणारी व्यक्ती एव्हरेस्टला जाऊ लागली आहे. आता शेरपा तुम्हाला सर्वोतोपरी मदत करतो. अपघातात वाचवण्यापासून कुठलेही संकट, अडचणी आल्या तरी तो शेवटपर्यंत तुमची साथ सोडत नाही. आता एव्हरेस्ट चढाईचे कुतूहल राहिलेले नाही. अलीकडच्या काळातले सोपे झालेय का?                  आमच्या एव्हरेस्ट मोहिमेवेळी आर्थिक अडचणी खूप आल्या होत्या. साहित्य गोळा करण्यासाठी सदस्यांनी खूप प्रयन्त केले. कॉपोर्रेट कंपन्याकडून डोनेशन मिळवण्याचा आम्ही प्रयन्त केला. त्यासाठी इतर पर्वतांवर पार पडलेल्या यशस्वी मोहिमांची सादरीकरण दाखवावी लागली. चाळीस ते पन्नास कंपन्यांना दाखवल्यावर एखाद्या कंपनीकडून डोनेशन मिळायचे. आता अनेक संस्था आर्थिक मदत करतात. डोनेशन मिळवण्यात अडचणी येत नाहीत. गिर्यारोहण करणाऱ्या संस्थांनी तरुण मंडळींना तांत्रिक मार्गदर्शन करावे. गिर्यारोहण करताना कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याबद्दलची जनजागृती आवश्यक आहे. सध्याची तरुणाई किल्ले, पर्वतांवर, तसेच जंगलात जाण्यास उत्सुक असते. मात्र एखाद्या किल्ल्यावर कचर्याचे प्रमाण वाढले की तिकडे जाण्यास बंदी घातली जाते. अपघात झाला की सरकारला जबाबदार धरले जाते. प्रत्येक वेळी सरकारला दोष देऊन चालणार नाही. गड, किल्ले, पर्वतांवरील कचरा समस्या दूर सोडवण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. नियमांचे पालन केले तर अपघातही सहसा होत नाहीत. तंत्रज्ञानाच्या, संपर्काच्या प्रगतीमुळे गिर्यारोहणातले धोके टाळण्यासही मदत होते. ....................................................................................................

टॅग्स :PuneपुणेEverestएव्हरेस्टTrekkingट्रेकिंग