शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नव्या शैक्षणिक धोरणाबाबत केंद्राने मागविल्या सूचना: ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 04:02 IST

‘इनोव्हेट इंडिया’ संकेतस्थळावर नोंदवायची मते

अविनाश साबापुरेयवतमाळ : केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेले नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्ष राबवताना राज्य सरकारांच्या अखत्यारीतील शिक्षकच खरे सूत्रधार ठरणार आहेत. धोरणाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चित करताना देशभरातील शिक्षकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यातूनच नवा ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ साकारणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सचिव अनिता करवल यांनी राज्याच्या शिक्षण सचिवांना पत्र पाठविले आहे. त्यासोबतच सोमवारपासूनच शिक्षकांना केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर सूचना नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या ३१ आॅगस्टपर्यंत सूचना नोंदविता येणार आहेत. शिक्षकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ग्रामीण गट संसाधन केंद्रांवर व्हीडिओ कॉन्फरन्स व अन्य मार्ग अवलंबण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.सूचनांचे काय करणार ?इनोव्हेट इंडिया या संकेतस्थळावर शिक्षकांनी सूचना नोंदवायच्या आहेत. त्यासाठी संकेतस्थळावर शिक्षण धोरणातील एक-एक घटक सुट्या स्वरूपात देऊन त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. ३१ आॅगस्टपर्यंत आलेल्या सर्व सूचनांचे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील तज्ज्ञांच्या चमूमार्फत परिक्षण केले जाणार आहे. राष्टÑीय अभ्यासक्रम आराखडा किंवा धोरणाच्या अमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूचनांबाबत संबंधित शिक्षकाशी वैयक्तिक संपर्क साधला जाणार आहे.नव्या धोरणानुसार शिक्षण प्रशिक्षण विद्यालये बंद होणार नाही. तर ते समायोजित होतील. याबाबत प्रत्यक्ष अमलबजावणीला २०२८ पर्यंत वेळ लागणार आहे. सध्या सुरू असलेले शिक्षक प्रशिक्षण प्रोग्राम सुरूच राहणार आहेत. त्यादृष्टीने सूचना करण्यात येतील. - राजेश माळी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अध्यापक विद्यालय कर्मचारी संघटनाराज्य स्तरावरून याबाबत निर्देश आलेले नसले तरी हे सर्वांसाठी खुले आहे. धोरणाचा आराखडा तयार आहे. त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी कशी करावी, हे दररोज अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा अनुभव घेणारे शिक्षकच चांगल्या प्रकारे सांगू शकतील. त्यामुळे प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षकांनी जरूर सूचना नोंदवाव्यात. - मिलिंद कुबडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ

टॅग्स :Educationशिक्षण