शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:16 IST

यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत एकवीसशे भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत एकवीसशे भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.या हंगामात शेतकरी संघटनांनी ३५00 रुपये पहिली उचल देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. नंतर २५00 रुपयांपर्यंत माघार घेतली. गंगामाई कारखान्याने २५२५, ज्ञानेश्वरने २५०० तर केदारेश्वरने २५५० रुपये पहिली उचल जाहीर केली. अशोकने २१००, कुकडी, प्रसाद, गणेश, विखे, थोरात, काळे व संजीवनी कारखान्याने २३०० रुपये पहिली उचल जाहीर केली. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा प्रति क्विंटल ४ हजार रुपये भाव ३४०० ते ३२००वर आल्याने २३०० रुपयेच पहिली उचल शक्य आहे. साखरेचा दर ३००० रुपयांपेक्षा कमी झाल्यास उसाला भाव देणे अवघड होईल, असे थोरात कारखान्याचे माधवराव कानवडे यांनी स्पष्ट केले होते.देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा भाव २८५० रुपयांवर आला आहे. तो आणखी घसरू शकतो. याबाबत साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदारांची बैठक झाली. त्यात साखरेच्या दरातील घसरणीमुळे एफआरपी देणेही शक्य नसल्याने कारखान्यांनी २१०० रुपये भाव द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २५५० च्या आसपास पहिली उचल जाहीर करणाºया कारखान्यांनाही माघार घ्यावी लागली आहे.पैसा देणार कसा?साखरेच्या दरात सतत घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीस नोव्हेंबरमध्ये असलेला साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटल साखरेचा भाव आता २८५० रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यानुसार राज्य सहकारी बँकेचे साखरेचे मूल्यांकन १७५० रुपयांपर्यंत खाली आले आहे. साखरेच्या दरासोबतच मूल्यांकन आणखी कमी होणार आहे. त्यामुळे उसाला पैसा देणार कसा? एफआरपी देणेही अशक्य आहे. त्यामुळे २१०० रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.- शिवाजीराव नागवडे, अध्यक्ष, राज्य साखर संघ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी