शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

व्यापा-यांवरील साखर साठा मर्यादा हटविली, केंद्राचा अध्यादेश : दर वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 02:18 IST

व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे.गेल्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी एप्रिल २०००पासून केंद्राने व्यापाºयांवर साखरसाठा मर्यादा लागू केली होती. ३१ डिसेंबर रोजी तिची मुदत संपत आहे. यंदाच्या साखर हंगामात पहिल्या अडीच महिन्यांत ३० टक्के म्हणजे ६९ लाख ४० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत ते ५३ लाख ४६ हजार टन इतके होते. सध्या घाऊक बाजारातील साखरेचे दर ३००० ते ३१५० रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. सरकारच्या निर्णयाने मागणी वाढून साखरेचे दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेर २५ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले. गतवर्षी याच कालावधीत ते १७ लाख २५ हजार टन होते. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात २३ लाख ३७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.साठा मर्यादा हटविण्याचा निर्णय म्हणजे व्यापाºयांना साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने दिलेली नाताळची भेट आहे.- प्रफुल्ल विठलानी, चेअरमन,आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनसाठा मर्यादा काढून टाकण्याची मागणी अनेक महिने करत होतो. नियंत्रणमुक्त केल्याने कोसळणारे दर थोडे सावरतील, पण बॅँकांची उचल आणि उसाची पहिल्या उचलीचा ताळतंत्र घालताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.- पी. जी. मेढे,साखर कारखानदारीचे तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने