शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

साखरेचे भाव पडले, राज्याचे केंद्राकडे बोट

By अतुल कुलकर्णी | Updated: March 20, 2018 00:59 IST

राज्यात गतवर्षीच्या हंगामातील १२ लाख टन साखर शिल्लक असून यंदा ९४.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ३१ मार्चपर्यंत साखर कारखाने चालू राहणार असल्यामुळे आणखी १२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल.

मुंबई : राज्यात गतवर्षीच्या हंगामातील १२ लाख टन साखर शिल्लक असून यंदा ९४.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ३१ मार्चपर्यंत साखर कारखाने चालू राहणार असल्यामुळे आणखी १२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल. परिणामी, साखरेचे भाव ३५०० रुपये क्विंटलवरून २८५० पर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे उसाला एफआरपीनुसार कसा भाव द्यायचा, असा सवाल साखर कारखानदार करत आहेत. तर राज्य सरकारने यासाठी केंद्राकडे बोट दाखवले आहे.याबाबत राष्टÑीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, पाकिस्तानने जसे अनुदान देऊन साखरेची निर्यात केली तसे अनुदान देऊन राज्यातील २० लाख मेट्रीक टन साखर निर्यात केली किंवा केंद्राने ५० लाख टन साखरेची राखीव साठा योजना राबवली तरच साखरेचे भाव सुधारतील. अन्यथा पुढच्या वर्षी कारखानेच सुरू होऊ शकणार नाहीत. शेतात उभ्या उसालाही दर देण्याची वेळ सरकारवर येईल, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला आहे.राज्याची साखरेची गरज २४ लाख टन असताना महाराष्टÑात ११८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात १०१ सहकारी आणि ८६ खाजगी अशा १८७ साखर कारखान्यांनी आजमितीस ८५१.४८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ज्याचा उतारा ११.०९ आला आहे. देशपातळीवरदेखील आपल्याकडे १९ राज्यांत साखरेची निर्मिती होते. त्यांचा एकत्रितसाठा पाहिला तर सध्याच ७५ लाख मे. टन अतिरिक्त साखर झालीआहे. नव्याने तयार होणारीसाखर कारखान्यांमध्ये पडून आहे. या वर्षीचे उसाचे पीक २३ टक्क्यांनी वाढले. पुढच्या वर्षी त्यात ३०टक्के वाढ अपेक्षित आहे. केंद्राने एफआरपीनुसार दर दिले नाहीत तर खटले दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कारखाने कसे चालवायचे, असा सवालही वळसे पाटील यांनी केला.निर्यातीचा वेगही मंदावलामिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आयातीवर ड्युटी लावल्याने साखरेची आयात थांबली. पण निर्यातीवर शुल्क लावल्याने निर्यातीचा वेगही मंदावला. दुसरीकडे सहकारी साखर कारखाने बंद पडले तर त्याआडून चालणारे काँग्रेस, राष्टÑवादीचे राजकारणही संपुष्टात येईल असा समज भाजपात आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र