शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

साखरेचे दर नियंत्रणातच हवेत- महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 04:16 IST

गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही सणासुदीच्या काळात स्वस्त दरात साखर मिळावी या उद्देशानेच केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरसाठ्यावर मर्यादा आणल्याचे सांगून साखरेचे दर नियंत्रणातच राहायला हवेत

मुंबई : गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही सणासुदीच्या काळात स्वस्त दरात साखर मिळावी या उद्देशानेच केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरसाठ्यावर मर्यादा आणल्याचे सांगून साखरेचे दर नियंत्रणातच राहायला हवेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केले.आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने तीन दिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या समारोप सत्रात बोलताना पंकजा मुंडे यांनी साखरेच्या साठ्यांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचे जोरदार समर्थन केले. या वेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील तसेच माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. पंकजा मुंडे यांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी जयंत पाटील आणि वळसे-पाटील यांची भाषणे झाली. यात केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर निर्बंध आणले आहेत. गरिबांना कमी दरात साखर मिळावी असे सगळ्यांनाच वाटते, परंतु त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ नये, अशी भूमिका या दोन्ही नेत्यांनी मांडली. शिवाय साखर उद्योगाबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.या पार्श्वभूमीवर बोलताना पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन केले. साखर उद्योगात शेतकरी आणि ग्राहक या दोन घटकांनाच प्राधान्य मिळायला हवे, असे मुंडे म्हणाल्या. साखर उद्योगाचे स्वरूप हंगामी असल्याने त्याबाबत दीर्घकालीन धोरण आखणे शक्य नाही. परदेशात १९२ दिवसांचा हंगाम असला तरी भारतात तशी परिस्थिती नाही. बीडसारख्या दुष्काळी भागात पाण्याअभावी काही वर्षे अवघ्या २५-३० दिवसांचे हंगाम झाले. ४० रुपयांची साखर ४५ झाली तर काय फरक पडतो, हा प्रश्न गैरलागू आहे. रेशनिंग दुकानातील साखर घेणाºया गरीब घटकासाठी पाच रुपयांचा हा फरकसुद्धा मोठा ठरतो, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली. साखर उद्योगातील सर्व घटकांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सरकार व साखर उद्योगातील दुवा म्हणून काम करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे