शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

“कारखाना हे राजकारण नाही तर हा धंदा आहे”; शरद पवारांनी टोचले ऊस उत्पादकांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 19:59 IST

ऊसाचा टनाला जितका भाव मिळतोय त्यापेक्षा इथनॉलला दुपटीने भाव मिळेल हे मी खात्रीने सांगतो असं शरद पवार म्हणाले.

नाशिक - शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीत बदल करत ऊसाला अधिक उतारा कसा मिळेल यासाठी दर्जेदार ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर द्यावा तसेच कारखानदारी यशस्वी होण्यासाठी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन उत्पादन करावे असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनी केले आहे.  

रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि. काकासाहेब नगर रानवड या कारखान्याचा ३९ वा गळीत हंगाम शुभारंभावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, साखर काढून हा धंदा टिकणार नाही. वीज निर्मिती करण्याचा विचार केला पाहिजे वीज निर्मिती बाबत आम्ही राज्यातील मंत्र्यांशी बोलू मार्ग काढू. वीज निर्मिती साठी कारखाने पुढे आले ही आनंदाची बाब आहे. अनेक वाहन ही इथेनॉल मध्ये आणलीय, बाहेरच्या देशात हे होतंय तर आपल्याकडे होईल. ऊस हे महत्वाचे पीक तसे आळशांचे पीक आहे. उसाचे पीक घेतले की गडी त्याकडे लक्ष देत नाही. द्राक्ष पीक घेतले तर त्याकडे लक्ष दिले जाते. उसाची लागण केली तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लागण झाली की नाशिकला जाऊन बसतो. सगळ्या जगाची चर्चा करत बसतो, उसाचे काय झालं त्याकडे लक्ष देतो. निवडणूक आणि बाकीच्या गोष्टीकडे लक्ष घालता अशा शब्दात त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कान टोचले आहेत.

तसेच ऊसाचा टनाला जितका भाव मिळतोय त्यापेक्षा इथनॉलला दुपटीने भाव मिळेल हे मी खात्रीने सांगतो. वीज आणि हायड्रोजन तयार करण्याचा प्रयत्न करता येईल. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर ती भरपाई करण्याची हिंमत ठेवली पाहिजे. कारखाना हे राजकारण नाही तर हा धंदा आहे. जगाला साखर पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्राची आहे. जगाला साखर देणारे देश अडचणीत आलेत. त्यामुळे चांगल्या दर्जाचा उस निर्माण केला पाहिजे, त्याचा उतारा चांगला काढला पाहिजे. ब्राझीलचा कारखाना हा जसे काम करतो तसे काम करावे लागेल. ते कारखाने ३५ हजार टन उस गाळप करतात. निवडणूक आली की किंमत करू नका. कारखाना सुरू केला की कामगारांना चांगला पगार द्या. कारभार चांगला करा, संस्था तोट्यात जाणार नाही याचा विचार करा असा सल्लाही शरद पवारांनी दिला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार