शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 15:48 IST

Chandrapur Loksabha Constituency : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील एक्झिट पोल समोर येताच भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केलं आहे.

Sudhir Mungantiwar : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. विविध एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार अनेक तगड्या उमेदवारांचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या निकालामुळे आता भाजपचं टेंशन वाढलं आहे. तर दुसरीकडे, पराभवानंतर खचनार नाही, असं विधान मुनगंटीवार यांनी केलंय. त्यामुळे आता मुनगंटीवार यांची निराशेची भाषा कशासाठी अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर देशभरात एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजपचे ४५ पेक्षा अधिक जागा मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे दिसतंय. तसेच भाजपच्या बड्या उमेदवारांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारण्याची शक्यता आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाची शक्यता काही एक्झिट पोलने वर्तवली आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवण्यासाठी मी तयार नव्हतो, असं विधान केलं आहे.

पराभव अटल बिहारी, इंदिरा गांधी यांचाही झाला होता अशी सूचक प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपा माझासोबत बोलताना दिली. "चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो. पण पक्षाचा आदेश आला आणि ही जागा लढवली. आनंदाची गोष्ट आहे की एक्झिट पोलच्या सर्व्हेमधून जनतेच्या मनातील भावना व्यक्त झाली. मला वाटत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासावर मतं मागितली. हा देश म्हणजे माझा परिवार आहे, या भावनेने त्यांनी काम केलं. या देशातील जनतेनं ४ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने कौल उभा केला तर देशाचा जास्त फायदा आहे," असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

"अमित शाह यांनी म्हटलं होतं की, आम्ही कितीतरी पराभव सहन केले आहेत. मला वाटतं आमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. शेवटी पक्षाचा विजय आणि पराभव यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून राहत नाही. तर संघटना, विचार, पक्षाचं संघटन यावरही अवलंबून असतं. त्यामुळे एखादा पराभव होतो. देशात अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोर जावं लागलं होतं. मात्र, पराभवानंतरही त्यांनी नैतिकतेमध्ये कणभरही फरक पडू दिला नाही. पण राहुल गांधींना पराभव झाला की जाती दिसतात," असेही मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४chandrapur-pcचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी