शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:49 IST

राज ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्याने मनसे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Narendra Modi Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ केंद्रीय आणि राज्य मंत्र्‍यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला देशभरातली मान्यवरांसह परदेशातील प्रमुख पाहुणे देखील उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्रात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला या सोहळ्यासाठी निमंत्रित न केल्याने मनसे नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यावरुन आता भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन याची घोषणा केली. त्यानंतर राज्यभर मनसे नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रत्यक्षात राज ठाकरे यांनी मैदानात उतरत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतलेल्या उमेदवारांचा विजय देखील झाला. मात्र मनसेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याची खंत मनसे नेत्यांनी व्यक्त केली. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळाले असते तर आनंद झाला असता असं म्हटलं.

मनसेचे कार्यकर्ते महायुतीसाठी राबले - प्रकाश महाजन

"मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आमचे कार्यकर्ते राबले. त्यामुळे दिल्लीतील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. मनसे पक्ष हा एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणं अपेक्षित नव्हतं. मात्र, एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का, हे सांगणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण आहे. आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन आमचे कार्यकर्ते महायुतीसाठी राबत होते. निमंत्रण आलं असतं तर कुठं दिसले असते, मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आमंत्रण देण्यात विसरले असावेत. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपलेली आहे. गरज असल्यावर उंबरठे झिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचं. याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहेत. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती. आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता," असे म्हणत प्रकाश महाजन यांनी आपली खंत व्यक्त केली होती.

घाईमध्ये निमंत्रण द्यायचे राहून गेलं - सुधीर मुनगंटीवार

या सगळ्या प्रकरणावर आता भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. ही गोष्ट मी वरिष्ठांच्या कानावर टाकणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. "या संदर्भात बाळा नांदगावकर म्हणाले की आम्हाला निमंत्रण आलेलं नाही. हे निश्चितपणे मी वरिष्ठांच्या कानावर टाकणार आहे. घाई गर्दीमध्ये विसरले असतील. यामध्ये दुसरे काही कारण वाटत नाही. कधी कधी घाईमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात तिथे कधी कधी आपले मित्र आहेत त्यांना निमंत्रण द्यायचे राहून जातं. केंद्रीय पक्षाने याची नोंद घ्यायला हवी. आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढ करतो तेव्हा असं होऊ नये याची काळजी घ्यायला हवी," असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार