शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

“भाजपात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, परंतु, देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय की...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 16:20 IST

शरद पवारांना अजून BJP समजलीच नाही, असे सांगत भाजप नेत्यांनी टीका केली आहे.

Sudhir Mungantiwar: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी केल्यानंतर वर्षभरातच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सत्तेत सहभागी झाले. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. आणखी आमदार गटात येणार असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. यातच आता भाजपमध्ये येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, असा दावा भाजप नेत्याने केला आहे.

भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी बोलणे झाले आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावे की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे खुले आव्हान देत, भाजपमध्ये येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत. भारतीय जनता पक्षात येण्यासाठी रांग लागली आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

शरद पवारांना अजून भाजप समजलीच नाही

शरद पवार यांना परिवारवादाची ती व्याख्या वाटत असेल पण आम्हाला तो परिवादच वाटतो. १०५ आमदार जरी असले तरी ४३ मंत्री होणार आहेत. तुम्हाला भाजप अजून समजलीच नाही, असे म्हणत शरद पवार यांच्या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. तसेच आपला देश अर्थव्यवस्थेत प्रगती करत आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. जर्मनी आणि जपान हे दोन्ही देश आपल्यामागे जाऊ शकतात. यामध्ये राज्याचा वाटाही खूप मोठा आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांनी फक्त घोषणा केली. मात्र महायुतीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत. हे खरे आहे की, काही शेतकऱ्यांना अजून मदत मिळणे बाकी आहे. पण आम्ही ती लवकरच देऊ. सगळे राज्य चालवायचे आहे. त्याचे आर्थिक गणित आहे, असे मुनगंटीवार  म्हणाले.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस