शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘अशी’ भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:24 IST

‘ते’ सध्या ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, ‘ती’ मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.

औरंगाबाद : ‘ते’ सध्या ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, ‘ती’ मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.येथील एका उर्दू दैनिकाच्या ५० व्या वर्धापन दिन सोहळ्याला ते आले होते. आम्हीही सत्तेत होतो; मात्र अशी खालच्या पातळीवरची भाषा कधी वापरली नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.काल मुंबईत भाजपाचा महामेळावा झाला. त्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांचा समाचार घेताना त्यांना प्राण्यांची विशेषणे लावली होती. त्यावर चव्हाण यांनी नापसंती दर्शविली. महिनाभरात आघाडीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी होऊ शकेल, अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली.देशभरात सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी राहुल गांधी ९ एप्रिलला उपोषण करणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पाठिंबा म्हणून लाक्षणिक उपोषण व त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात सभाही होतील. मुंबईत अलीकडेच तीन दिवसीय आढावा बैठक झाली. त्यामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. राजकीय परिस्थिती रोज बदलत आहे. राहुल गांधी यांच्याकडे आम्ही आमचा अहवाल देऊ. आघाडीबद्दल राहुल गांधी व शरद पवार यांच्यात चर्चा होऊन निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.भाजपा हा भांडवलदारांचा पक्षचिखली (बुलडाणा) : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात आणि राज्यात सत्ता हस्तगत केलेला भाजपा हा केवळ सत्तेसाठी हपापलेला पक्ष आहे. तो केवळ भांडवलदारांसाठी काम करतो, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेस हा सत्यासाठी लढा देणारा पक्ष आहे. काँग्रेसचा विचार मजबूत होता, म्हणून देश उभा राहिला. जनतेनेही ६० वर्षे सत्तेची संधी पक्षाला दिली, परंतु गेल्या चार वर्षांत भाजपा सरकारने एकही नवी योजना राबविली नाही, उलट अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आता समाजातील एकही घटक या सरकारवर खूश नाही. मुख्यमंत्री आपल्या पदाला न शोभणारे वक्तव्य करून, जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. सत्तेची धुंदी चढल्याने त्यांनी पातळी सोडली आहे. त्यांचा मस्तवालपणा वाढला आहे. त्यांना लोकशाहीचादेखील विसर पडला असून, ऊठसूट धमकावण्याची भाषा वापरली जात आहे. विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांनादेखील धमकावले जाते़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण