शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप

By admin | Updated: October 19, 2014 00:57 IST

मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांमधील ही भीती कमी व्हावी, आणि त्यांना डेंग्यू आजार नेमका काय आहे आणि त्या आजारात

अशी घ्या काळजी : आरोग्य विभागाने सुचविल्या उपाययोजनानागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांमधील ही भीती कमी व्हावी, आणि त्यांना डेंग्यू आजार नेमका काय आहे आणि त्या आजारात काय उपाययोजना कराव्यात, यासंबंधी थोडक्यात माहिती सादर करीत आहोत. डेंग्यू हा विषाणूज्वर (व्हायरल डिसीज) आहे. यावर्षी डेंग्यूने संपूर्ण राज्याला आपल्या विळख्यात घेतले आहे. नागपुरातही मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची साथ पसरली आहे. जीवघेणा डेंग्यू डेंग्यूचे त्वरित निदान होऊन उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यास ते घातक ठरते. या जीवघेण्या डेंग्यूचे दोन प्रकार आहेत. १) हिमोऱ्हेजिक डेंग्यू ,२) डेंग्यू शॉक४वेळेवर निदान न झाल्यास हिमोऱ्हेजिक डेंग्यू होण्याची शक्यता असते. दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने ताप राहणे, त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर रुग्णाच्या पोटात आणि व आतड्यांमध्ये रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव हृदयात, यकृत प्लिहा (स्लीन) मेंदूमध्ये होतो. त्याला कंट्रोल करणे डॉक्टरांना शक्य राहत नाही. कमी रक्तदाब झाल्यास रुग्ण शॉकमध्ये जातो आणि मृत्यू पावतो. घ्यावयाची काळजी डेंग्यूवर रामबाण औषध नाही. वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावा लागतो. परंतु डेंग्यू होऊन नये यासाठी नागरिकांनीच काळजी घ्यावयाची गरज आहे. एडिसी इजिप्ती या डासामुळे डेंग्यू होतो. तेव्हा या डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी घरात आणि परिसरात शक्यतोवर स्वच्छता ठेवावी. परिसरात डबके साचणार नाही याची काळजी घ्यावी, पाण्याचे टाके झाकून ठेवावे, अबेट नावाचे तेल पाण्यावर टाकले तर एडिस इजिप्ती डासाचे अंडे वाढत नाही, त्याचाही वापर करता येईल. आठवड् यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. यादिवशी घरातील टाके, व पाण्याने भरलेले सर्व भांडे रिकामे करावेत. एकूणच स्वच्छतेवर भर द्यावा. त्यामुळे डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण आणता येईल. नागपुरातही विषाणूजन्य प्रयोगशाळेची गरज मेंदूज्वर, डेंग्यू, स्वाईन फ्लू यांसारख्या विषाणूज्वराचे हमखास निदान पुण्याच्या विषाणूजन्य प्रयोगशाळेत केले जाते. राज्यभरातून विविध आजारासाठी नमुने प्रयोगशाळेत पडून असतात. त्यामुळे अहवाल यायला उशीर होतो. अनेकदा तर रुग्ण बरा होऊन घरी गेलेला असतो किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतर अहवाल प्राप्त होत असतात. अशा अहवालाचा कुठलाही उपयोग होत नाही. नागपुरातून ज्या रुग्णांचे नमुने तपासाला पुण्याला पाठवले जातात. ते केवळ नागपूरचेच रुग्ण नसून संपूर्ण विदर्भ आणि छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातीलही असतात. पुण्याहून त्यांचे अहवाल उशिरा येत असल्याने उपचारात उशीर होतो. परिणामी योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे पुण्यातील विषाणूजन्य प्रयोगशाळेच्या धर्तीवर नागपुरातही प्रयोगशाळेची गरज आहे. राज्यात स्वाईन फ्लू याआजाराची साथ मोठ्या प्रमाणावर आली होती. तेव्हा नागपुरातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये निदानाची व्यवस्था करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. डेंग्यू संदर्भातही तशी व्यवस्था करता येऊ शकते.