शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प गुजरातनं पळवला?; ठाकरे गटाच्या आमदाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 13:29 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ३ मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत. १ मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असे असताना हा प्रकल्प गुजरातला नेणे म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी केल्यासारखे आहे असं त्यांनी टीका केली. 

सिंधुदुर्ग - राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने सत्ताधारी सरकारवर करत आहे. वेदांता फॉक्सकॉनपासून विविध प्रकल्पावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली. त्यातच आता राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी करत सरकारवर निशाणा साधला आहे. 

आमदार वैभव नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाईल. २०१८ मध्ये पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्र विभागाच्या पर्यटन खात्याने सिंधुदुर्गात आणला होता. त्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या प्रकल्पाला निधीची तरतूद केली होती.मात्र आता या प्रकारचे चांगले प्रकल्प गुजरातला नेण्याचा गुजरात शासन आणि केंद्र सरकारचा डाव आहे. हा डाव समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ३ मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत. १ मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असे असताना हा प्रकल्प गुजरातला नेणे म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी केल्यासारखे आहे असं त्यांनी टीका केली. 

तर महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर चाललेत त्यावर कॅबिनेटमध्ये बोलण्याची नारायण राणे यांच्यात ताकद नाही. मी २५ वर्ष शिवसेनेत होतो असं ते म्हणतात. मग त्यांनी चोखबाणा दाखवावा आणि राज्यातला एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही असं बोलावे. हिंमत आहे का? ज्यांनी शिवसेनेचे नाव चोरले त्यांनी सांगावे. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलावे. राज्यातला एकही उद्योग आणि रोजगार बाहेर जाऊ देणार नाही असं तुमच्यात हिंमत नाही अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवारांवर निशाणा साधला. 

काय आहे प्रकल्प?२०१८ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विभागाकडून १ हजार कोटींची तरतूद असलेला पाणबुडी प्रकल्प आणला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अतरंग अनुभवता येणार होते. मात्र आता हा प्रकल्प गुजरातच्या द्वारका इथं होणार असल्याची बातमी आहे.गुजरात सरकारने यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकांत आले आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातSanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे