शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण शून्यावर आणणार : तावडे

By admin | Updated: December 2, 2014 00:12 IST

अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू : तावडे

राजापूर : शाळांमधील स्वच्छतागृहांचा अभाव तसेच शैक्षणिक व्यवस्थेतील इतर अडचणी दूर करून विद्यार्थिनींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण येत्या पाच वर्षांत शून्यावर आणण्यात येईल, असा निर्धार शालेय शिक्षण, क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, सोमवारी आडिवरे (ता. राजापूर) येथे व्यक्त केला. कोकणातील शैक्षणिक गुणवत्तेला संधी देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी ठोस प्रस्ताव घेऊन पुढे यावे. त्यांच्या प्रस्तावांचा सकारात्मक विचार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी कोकणवासीयांना दिला.क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या आडिवरे येथील तावडे अतिथी भवनाचे भूमिपूजन आज मंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामदैवत किंवा कुलदैवत हा आपल्या श्रद्धेचा, इतिहासाचा आणि संस्कृतीचा भाग आहे. ज्या मातीतून आपण जन्माला आलो, त्या मातीचा अभिमान बाळगणे आणि तिथली मुळे घट्ट करणे, ही परंपरा जपणारी तसेच बळ देणारी गोष्ट आहे. यश आणि पदाच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हे बळ उपयोगी पडते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. येत्या पाच वर्षांत राज्याचा विकास करताना कोकणच्या सर्वांगीण विकासावर आपला विशेष भर राहणार असल्याचे सांगतानाच कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.मंडळाचे अध्यक्ष इंद्रनील तावडे, सचिव सतीश तावडे, उपाध्यक्ष दिनकर तावडे, माजी आमदार प्रमोद जठार, संजय यादवराव, आदींसह राज्याच्या सर्वदूर भागातून आलेले मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी विनोद तावडे यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी विकासकामांची सद्य:स्थिती आणि त्यांच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडविण्याबाबत चर्चा केली. शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करणे, रस्त्यांच्या विकास प्रक्रियेला गती देणे, शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रलंबित मंजुरी तातडीने देणे, पर्यावरणाचे प्रलंबित प्रश्न सोडविणे, आदींबाबतही यावेळी चर्चा झाली. जिल्हा पोलीस प्रमुखांकडून त्यांनी यावेळी कायदा-सुव्यवस्थेचाही आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू : तावडेकणकवली : शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेईन आणि मग राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवेन, असे सांगून राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भ्रष्टाचारामुळे यातील बरेचसे कर्ज झाले आहे. आम्ही आहोत तर भ्रष्टाचार होणार नाही आणि विकासही गतिमान होईल. त्यामुळे हे कर्ज येत्या अडीच वर्षांत फेडणे शक्य होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जानवली येथे प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात व्यक्त केला. ‘शिवसेना सत्तेत सहभागी होणारच’दरम्यान, स्थिर सरकारसाठी युतीतील गुंता अद्याप सुटला नसला तरी भविष्यात शिवसेना सत्तेत नक्की सहभागी होऊन अभेद्य युतीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहील, असा विश्वास राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आडिवरे येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील विद्यमान सरकार हे राष्ट्रवादीच्या टेकूवर असल्यामुळे ते पाच वर्षे काढील, याची खात्री भाजपला नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करता यावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना सत्तेत येईल आणि सरकार स्थिर असल्याचा दावाही तावडे यांनी केला.