शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

शासनाकडून ‘स्कॉलर’ विद्यार्थ्यांची थट्टा, शष्यवृत्तीपोटी मिळतात महिन्याला अवघे १०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:37 IST

प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत घसरली आहे.

दीपक जाधव पुणे : प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत घसरली आहे.महाराष्टÑ शासनाने गुणवंत विद्यार्थ्यांना गरीब परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी १९५४ पासून ४वी व ७वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा घेऊन दरमहा शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा घेतली जाते. दोन वर्षांपूर्वी या परीक्षांच्या इयत्तेमध्ये बदल करण्यात आला असून आता ५वी (पूर्व उच्च प्राथमिक) व ८वी (पूर्व माध्यमिक)च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. यंदा ५ वी व ८ वी या दोन्ही इयत्तांसाठी मिळून केवळ ७ लाख ८९ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. २००९मध्ये ही संख्या २१ लाख होती.शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाºया ५वीच्या १६ हजार, तर ८वीच्या १३हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आलेली नाही. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करूनही अनेक दिवस उलटले, तरी यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे़ परिक्षार्थींची संख्या अजून कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे़

टॅग्स :Studentविद्यार्थी