शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शासनाकडून ‘स्कॉलर’ विद्यार्थ्यांची थट्टा, शष्यवृत्तीपोटी मिळतात महिन्याला अवघे १०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:37 IST

प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत घसरली आहे.

दीपक जाधव पुणे : प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत घसरली आहे.महाराष्टÑ शासनाने गुणवंत विद्यार्थ्यांना गरीब परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी १९५४ पासून ४वी व ७वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा घेऊन दरमहा शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा घेतली जाते. दोन वर्षांपूर्वी या परीक्षांच्या इयत्तेमध्ये बदल करण्यात आला असून आता ५वी (पूर्व उच्च प्राथमिक) व ८वी (पूर्व माध्यमिक)च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. यंदा ५ वी व ८ वी या दोन्ही इयत्तांसाठी मिळून केवळ ७ लाख ८९ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. २००९मध्ये ही संख्या २१ लाख होती.शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाºया ५वीच्या १६ हजार, तर ८वीच्या १३हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आलेली नाही. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करूनही अनेक दिवस उलटले, तरी यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे़ परिक्षार्थींची संख्या अजून कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे़

टॅग्स :Studentविद्यार्थी