शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

अकरावीची सीईटी रद्दच्या निर्णयाचे स्वागत; शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी, पालकांच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 07:30 IST

प्रवेशाचा तिढा वाढण्याची भीती

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. याचे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे. अकरावी प्रवेशाचा तिढा या निर्णयाने वाढला असला आणि प्रवेशप्रक्रियेतील स्पर्धेची तीव्रता वाढणार असली तरी विद्यार्थ्यांना सीईटी नसल्याने दिलासा मिळाला आहे.अकरावी प्रवेशात एकसूत्रता आणि गुणांचे समानीकरण व्हावे या उद्देशाने राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासावर सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण विभाग, शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला. मात्र सुरुवातीपासूनच सीईटी परीक्षेसाठी असणारे विषय, तिसऱ्या लाटेच्या भीतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणारी सीईटी, राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा या सर्व मुद्द्यांवर या परीक्षेला विद्यार्थी, पालक, अभ्यासकांकडून विरोध होत होता. स्कूल लीडर फाउंडेशन संस्थेचे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ फ्रान्सिस जोसेफ यांनी ट्विटरवरून पालक, शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, विद्यार्थी यांचा सीईटीबाबतचा कल जाणून घेतला असता ६१ टक्के विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी सीईटीची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त केले, तर ३० टक्के विद्यार्थी पालकांनी सीईटी घ्यायला हवी अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. ५ टक्के लोक सीईटीसाठी आश्वस्त नव्हते तर ४ टक्के लोकांनी संभ्रमात असल्याचे सांगितले. या प्रश्नासाठी १ हजार १३० लोकांनी आपली मते नोंदविली होती.विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि प्रवेशासाठीची समानता लक्षात घेता न्यायालयाचा निर्णय स्वागताहार्य आहे. भविष्यात गोंधळ टाळण्यासाठी सर्व मंडळांनी एकत्रित येऊन समन्वय साधत अशा सीईटीचे नियोजन करणे आवश्यक आहे.- फ्रान्सिस जोसेफ, शिक्षणतज्ज्ञविद्यार्थी सीईटी देण्याच्या मन:स्थितीत नव्हते मात्र राज्य शिक्षण मंडळाने सीईटीचा घाट घातल्याने विद्यार्थी तणावात होते. इतर कोणत्याच राज्याकडून सीईटी घेतली जात नसताना हा निर्णय दिलासादायक आहे.- अनुभा सहाय, इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशन ऑफ इंडियानिर्णय दुर्दैवीप्रत्येक शाळेने आपापल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन प्रामाणिकपणे केले असावे, असे समजणे म्हणजे वस्तुस्थितीकडे कानाडोळा करणे होय. समान पद्धतीने गुणांकन झालेले नाही. त्यामुळे फक्त शाळांनी दिलेल्या गुणांवर अकरावी प्रवेश देणे चुकीचे आहे. सीईटीबद्दलचा निर्णय दुर्दैवी आहे.- विवेक पंडित, विद्यानिकेतन शाळेचे संस्थापकविद्यार्थ्यांना ज्या निर्णयाने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले तो निर्णय अखेर न्यायालयाकडूनच रद्द झाला. संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी, मराठी भाषेचा पर्याय नसणे, दहावीचा अभ्यासक्रम पुन्हा अभ्यासणे अशा अनेक त्रासातून विद्यार्थ्यांची सुटका झाली.- सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघविशेष विद्यार्थ्यांचा आणि इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांचा विचारच सीईटी परीक्षेत केला गेला नव्हता. शिक्षण विभागातील अधिकारी कामे रेटून नेण्याचा विचार करत असल्याने निर्णय चुकत आहेत आणि मग न्यायालयाकडून अशा प्रकारे त्या निर्णयावर ताशेरे ओढले जात आहेत.- रोहित ढाले, कार्याध्यक्ष, छात्रभारती विद्यार्थी संघटना