शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

केवळ एका विषयात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 17:26 IST

इंग्रजी या विषयात कमी गुण मिळाल्याने १८ वर्षीय शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली(बुलडाणा) : इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७९.३८ टक्के गुण उत्तीर्ण होवून देखील केवळ इंग्रजी या विषयात कमी गुण मिळाल्याने १८ वर्षीय शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील कव्हळा येथे १७ जुलैच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. विनायक संतोष लांडे वय १८ असे मृताचे नाव आहे. विनायक याने कॉमर्समधून इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला ७९.३८ टक्के गुण मिळाले. यामध्ये इंग्रजी या विषयात ५६ गुण मिळालेले असतानाही त्यास ते गुण कमी वाटत असल्याने तो तणावात होता. याच तणावातून शुक्रवारी सकाळी ५ वाजता तो आपल्या शेतात निघून गेला व शेतातील आंब्याच्या झाडाला त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या परिसरात ‘मॉर्निंगवॉक’साठी गेलेल्या नागरीकांनी ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी त्याच्या कुटूंबियांना माहिती दिली. दरम्यान याबाबत अमडापूर पोलिसांना माहिती पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामाअंती शवविच्छेदन होवून विनायकचा मृत्यू कुटूंबियांना सोपविण्यात आला. मृतक विनायक याच्या पश्चात वडील संतोषराव लांडे, आई सविता व बहिण गायत्री असा परिवार आहे. तो सहकार विद्यामंदीर बुलडाणाचाविद्यार्थी असल्याचे समजले. दरम्यान अभ्यासातही हुशार होता. तथापी त्याला इंग्रजी या विषयात समाधानकारक गुण मिळालेले असताना आणि चांगल्या गुणांनी त्याने इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असतानाही त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शोकाकूल वातावरणात त्याच्या पार्थीवावर दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थीHSC Exam Resultबारावी निकालSuicideआत्महत्या