शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

केवळ एका विषयात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 17:26 IST

इंग्रजी या विषयात कमी गुण मिळाल्याने १८ वर्षीय शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली(बुलडाणा) : इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७९.३८ टक्के गुण उत्तीर्ण होवून देखील केवळ इंग्रजी या विषयात कमी गुण मिळाल्याने १८ वर्षीय शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील कव्हळा येथे १७ जुलैच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. विनायक संतोष लांडे वय १८ असे मृताचे नाव आहे. विनायक याने कॉमर्समधून इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला ७९.३८ टक्के गुण मिळाले. यामध्ये इंग्रजी या विषयात ५६ गुण मिळालेले असतानाही त्यास ते गुण कमी वाटत असल्याने तो तणावात होता. याच तणावातून शुक्रवारी सकाळी ५ वाजता तो आपल्या शेतात निघून गेला व शेतातील आंब्याच्या झाडाला त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या परिसरात ‘मॉर्निंगवॉक’साठी गेलेल्या नागरीकांनी ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी त्याच्या कुटूंबियांना माहिती दिली. दरम्यान याबाबत अमडापूर पोलिसांना माहिती पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामाअंती शवविच्छेदन होवून विनायकचा मृत्यू कुटूंबियांना सोपविण्यात आला. मृतक विनायक याच्या पश्चात वडील संतोषराव लांडे, आई सविता व बहिण गायत्री असा परिवार आहे. तो सहकार विद्यामंदीर बुलडाणाचाविद्यार्थी असल्याचे समजले. दरम्यान अभ्यासातही हुशार होता. तथापी त्याला इंग्रजी या विषयात समाधानकारक गुण मिळालेले असताना आणि चांगल्या गुणांनी त्याने इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असतानाही त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शोकाकूल वातावरणात त्याच्या पार्थीवावर दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थीHSC Exam Resultबारावी निकालSuicideआत्महत्या