शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे ‘अच्छे दिन’ कधी ?

By admin | Updated: December 14, 2014 00:40 IST

एसटी महामंडळ हा शासनाचा उपक्रम आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे एसटी महामंडळ अडचणीत सापडले असून, महामंडळाला टोल टॅक्समधून वगळण्याची मागील अनेक वर्षांपासूनच्या मागणीला

शासनाचे दुर्लक्ष : विविध सवलतीचे ७५० कोटी थकलेदयानंद पाईकराव - नागपूरएसटी महामंडळ हा शासनाचा उपक्रम आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे एसटी महामंडळ अडचणीत सापडले असून, महामंडळाला टोल टॅक्समधून वगळण्याची मागील अनेक वर्षांपासूनच्या मागणीला सातत्याने बगल देण्यात येत आहे. याशिवाय महामंडळाकडून विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतीचे ७५० रुपये राज्य शासनाकडून महामंडळास घ्यावयाचे असून एसटी महामंडळ ‘अच्छे दिन’ कधी येणार, या प्रतीक्षेत आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हा शासनाचा उपक्रम आहे. एसटीच्या बस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देत आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासून सुरक्षित वाहतुकीचे साधन म्हणून एसटी महामंडळाची जबाबदारी वाढली आहे. परंतु राज्य शासनाचे एसटी महामंडळाकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रात टप्पे वाहतुकीचा परवाना फक्त एसटी महामंडळाला आहे. परंतु राज्यभरात सर्रास खाजगी ट्रॅव्हल्सकडून टप्पा वाहतूक सुरू आहे. यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी संख्या कमी झाली आहे. बसस्थानकापासून खाजगी वाहतुकीचे कार्यालय २०० मीटर असावे, असा नियम आहे. परंतु राज्यभरात बहुतांश ठिकाणी बसस्थानकाला लागूनच खाजगी वाहतुकीची कार्यालये आहेत. यामुळे या खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी वाढून त्याचा एसटीच्या महसुलावर थेट परिणाम होत आहे. राज्यात एसटी महामंडळाचे टोल टॅक्सवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात महामंडळाने १३२.५७ कोटी रुपये टोल टॅक्सच्या रूपाने भरले आहेत. याशिवाय याच कालावधीत प्रवासीकराचे ८५४ कोटी रुपये शासनाकडे भरले. एसटी महामंडळ शासनाचा उपक्रम असल्यामुळे एसटीला टोल टॅक्समधून तसेच प्रवासीकरातून वगळण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु राज्य शासनाने सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. एसटी महामंडळ अपंग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना २४ प्रकारच्या सवलती देते. या सवलतीची रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला मिळणे अभिप्रेत आहे. परंतु २०१३-१४ या आर्थिक वर्षात १४४६ कोटी शासनाकडून घ्यायचे होते. त्यातील ९०५ कोटी रुपये मिळाले असून, उर्वरित ७४१ कोटी अद्यापही महामंडळास मिळालेले नाहीत. यामुळे महामंडळाचा आर्थिक पाया डबघाईस आला असून, महामंडळ शासनाच्या धोरणामुळेच अडकित्त्यात सापडल्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने एसटीचे ‘अच्छे दिन’ येण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. ‘स्पीड लॉक’ काढण्याची गरजएसटी महामंडळाच्या बसेस एका मर्यादित स्पीडवर लॉक करण्यात येतात. त्यामुळे एका विशिष्ट वेगाच्या पलीकडे या गाड्या धावू शकत नाहीत. याउलट खाजगी प्रवासी वाहतुकीच्या गाड्या भरधाव वेगाने धावत असून प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसमुळे उशीर होत आहे. त्यामुळे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असल्याचे चित्र आहे.