शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 01:51 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा, या गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत

वालचंदनगर : अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा, या गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी रविवारी वालचंदनगर ते जंक्शन या मार्गावर वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे बहुजन क्रांतीचा विराट मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला. ‘एकच पर्व बहुजन सर्व’ असे घोषवाक्य घेऊन इंदापूरसह गावोगावचे मागासवर्गीय बहुजन बांधवांसह मुस्लिम बांधव या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. जवळपास ७ किलोमीटर लांबीच्या मार्गावर बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वालचंदनगर जुने बसस्थानकापासून दुपारी १ वाजता बहुजन क्रांती विराट मोर्चा जंक्शनकडे निघाला. सात किलोमीटर पायी चाललेल्या मोर्चात लहान मुले, शालेय विद्यार्थ्यांसह हजारो महिलांनी सहभाग घेतल्याने या बहुजन क्रांती विराट मोर्चाला सर्वत्र दिंडीचे स्वरूप आले होते. या मोर्चात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चात महिलांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात होती. इंदापूरसह वालचंदनगर, जंक्शन येथील विराट मोर्चात बारामती, इंदापूर, अकलूज, भिगवण येथील हजारो बहुजन समाज एकवटला होता. या मोर्चाला बहुजन समाजातील हजारो महिला, शालेय विद्यार्थी तसेच चिमुकल्यांनीही सहभाग घेतला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार काढून घेतल्यास हा दलित बहुजन समाज गप्प बसणार नाही. दलितांसाठी हे अ‍ॅट्रॉसिटीचे कवच आहे. कवच काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास बहुजन समाज गप्प बसणार नाही, असे बहुजन समाजातील तरुणांनी मनोगत व्यक्त केले. या कायद्यात नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक कडक तरतुदी आहेत. (वार्ताहर)>जंक्शन चौकात मोर्चा स्थिरावला...जंक्शन चौकात बारामती, इंदापूर, वालचंदनगर, कळस या मुख्य रस्त्यावर बहुजन क्रांतीचा मोर्चा एकत्रित येऊन स्थिरावला. जंक्शन येथे तीन तास बहुजन क्रांती मोर्चा स्थिरावला होता. या बहुजन क्रांती विराट मोर्चासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, सहायकपोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.>पूजा जाधव खूनप्रकरणाची सीबीआयमार्फत तपास करा...तसेच इंदापूर तालुक्यातील तावशी येथील पूजा जाधव या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा. या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी, सरकारी वकील, निलंबित न्यायाधीशांची चौकशी करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खटल्याची फेरसुनावणी करावी, अशीमागणी करण्यात आली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांना शालेय मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.>मागण्यांचे केले जाहीर वाचन...बहुजन क्रांती मोर्चाच्या मागण्या सर्वांपुढे वाचून दाखवण्यात आल्या.‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा अधिक कडक करावा, या कायद्यातंर्गत दाखल झालेल्या खटल्यांसाठी स्वतंत्र्य न्यायालये सुरू करावीत, या खटल्यांचा निकाल ६ महिन्यात लागावा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत खोटी तक्रार करायला लावणाऱ्या, गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर याच कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावेत. ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करावी, मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या कोट्यातून देऊ नये, विमुक्त भटक्या समाजालादेखील ‘अ‍ॅट्रॉसिटी’कायद्याच्या कक्षेत आणावे, मुस्लिम बांधवांच्या विकासासाठी ‘सच्चर आयोगा’च्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागण्या करण्यात आल्या. >कायद्याची बदनामी...देशातील दलित, मागासवर्गीयांना, सर्व जातीच्या महिलांना या कायद्यामुळे संरक्षण मिळाले आहे. मात्र, मराठा समाजाच्या मोर्चात चुकीच्या पद्धतीने या कायद्याला बदनाम केले जात आहे. मराठा आरक्षण, कोपर्डीतील आरोपींना शिक्षा याला आमचा पाठिंबा आहे परंतु ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्दच करा, अशी मागणी बारामतीच्या मोर्चात केली गेली. त्याचबरोबर दलित, आदिवासींच्या भावना दुखवणारी आणि भडक भाषणे पोलीस, महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जात आहेत. त्याला आमचा विरोध आहे, असे या वेळी ठणकावून सांगितले.