शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 01:51 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा, या गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत

वालचंदनगर : अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा, या गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी रविवारी वालचंदनगर ते जंक्शन या मार्गावर वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे बहुजन क्रांतीचा विराट मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला. ‘एकच पर्व बहुजन सर्व’ असे घोषवाक्य घेऊन इंदापूरसह गावोगावचे मागासवर्गीय बहुजन बांधवांसह मुस्लिम बांधव या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. जवळपास ७ किलोमीटर लांबीच्या मार्गावर बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वालचंदनगर जुने बसस्थानकापासून दुपारी १ वाजता बहुजन क्रांती विराट मोर्चा जंक्शनकडे निघाला. सात किलोमीटर पायी चाललेल्या मोर्चात लहान मुले, शालेय विद्यार्थ्यांसह हजारो महिलांनी सहभाग घेतल्याने या बहुजन क्रांती विराट मोर्चाला सर्वत्र दिंडीचे स्वरूप आले होते. या मोर्चात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चात महिलांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात होती. इंदापूरसह वालचंदनगर, जंक्शन येथील विराट मोर्चात बारामती, इंदापूर, अकलूज, भिगवण येथील हजारो बहुजन समाज एकवटला होता. या मोर्चाला बहुजन समाजातील हजारो महिला, शालेय विद्यार्थी तसेच चिमुकल्यांनीही सहभाग घेतला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार काढून घेतल्यास हा दलित बहुजन समाज गप्प बसणार नाही. दलितांसाठी हे अ‍ॅट्रॉसिटीचे कवच आहे. कवच काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास बहुजन समाज गप्प बसणार नाही, असे बहुजन समाजातील तरुणांनी मनोगत व्यक्त केले. या कायद्यात नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक कडक तरतुदी आहेत. (वार्ताहर)>जंक्शन चौकात मोर्चा स्थिरावला...जंक्शन चौकात बारामती, इंदापूर, वालचंदनगर, कळस या मुख्य रस्त्यावर बहुजन क्रांतीचा मोर्चा एकत्रित येऊन स्थिरावला. जंक्शन येथे तीन तास बहुजन क्रांती मोर्चा स्थिरावला होता. या बहुजन क्रांती विराट मोर्चासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, सहायकपोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.>पूजा जाधव खूनप्रकरणाची सीबीआयमार्फत तपास करा...तसेच इंदापूर तालुक्यातील तावशी येथील पूजा जाधव या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा. या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी, सरकारी वकील, निलंबित न्यायाधीशांची चौकशी करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खटल्याची फेरसुनावणी करावी, अशीमागणी करण्यात आली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांना शालेय मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.>मागण्यांचे केले जाहीर वाचन...बहुजन क्रांती मोर्चाच्या मागण्या सर्वांपुढे वाचून दाखवण्यात आल्या.‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा अधिक कडक करावा, या कायद्यातंर्गत दाखल झालेल्या खटल्यांसाठी स्वतंत्र्य न्यायालये सुरू करावीत, या खटल्यांचा निकाल ६ महिन्यात लागावा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत खोटी तक्रार करायला लावणाऱ्या, गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर याच कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावेत. ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करावी, मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या कोट्यातून देऊ नये, विमुक्त भटक्या समाजालादेखील ‘अ‍ॅट्रॉसिटी’कायद्याच्या कक्षेत आणावे, मुस्लिम बांधवांच्या विकासासाठी ‘सच्चर आयोगा’च्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागण्या करण्यात आल्या. >कायद्याची बदनामी...देशातील दलित, मागासवर्गीयांना, सर्व जातीच्या महिलांना या कायद्यामुळे संरक्षण मिळाले आहे. मात्र, मराठा समाजाच्या मोर्चात चुकीच्या पद्धतीने या कायद्याला बदनाम केले जात आहे. मराठा आरक्षण, कोपर्डीतील आरोपींना शिक्षा याला आमचा पाठिंबा आहे परंतु ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्दच करा, अशी मागणी बारामतीच्या मोर्चात केली गेली. त्याचबरोबर दलित, आदिवासींच्या भावना दुखवणारी आणि भडक भाषणे पोलीस, महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जात आहेत. त्याला आमचा विरोध आहे, असे या वेळी ठणकावून सांगितले.