शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

राज्यात नव्या वर्षात शेती आणि आरोग्य सेवांचे बळकटीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 06:31 IST

शेतीला पर्याय नाही, लोकसंख्या वाढते आहे, त्या तुलनेत शेती उत्पादनही वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतीक्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यावर सरकारचा भर आहे.

नवीन २०२२ वर्ष सुरू झाले आहे. या वर्षातही कोरोनाचे सावट राहणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात कसे बदल होतील, नेमके काय करायला हवे, यावर तज्ज्ञांंनी टाकलेला हा क्ष किरण 

प्रकाशकांनी ‘टेक्नोसॅव्ही’ व्हायला हवेप्रकाशकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर पुस्तकांच्या खरेदी-विक्रीवर कोणताच फरक पडणार नाहीये. कोणताही कंटेंट ई-बुक्स किंवा ऑडिओ बुक्स स्वरूपात क्लाऊडवर उपलब्ध आहे. हा कंटेट क्लाऊडवर राहू शकतो आणि त्याची विक्रीही होऊ शकते. हा सर्व तांत्रिक बदल प्रकाशकांनी स्वीकारला पाहिजे. त्यांनी ‘टेक्नॉसॅव्ही’ झाले पाहिजे. सध्या किंडलवर पुस्तके वाचता येतात. आगामी काळात त्यात ऑडिओ आणि व्हिज्युअल्सदेखील टाकता येणार आहे. - सुनील मेहता, प्रकाशक, मेहता पब्लिकेशन हाऊस

कोरोनाची सवय होईलआता आपल्याला कोरोनासोबतच राहायचे आहे. त्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्रांमध्ये अशा स्वरूपाचे स्क्रीनिंग करून नवीन आजारांविषयी अभ्यासाला चालना मिळेल. कोविडचे म्युटंट खूप येत आहेत. त्या दृष्टीने लोकशिक्षण आणि आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांच्या आरोग्य शिक्षणावर भर दिला जाईल. टेलिमेडिसिनचे क्षेत्र विस्तारेल. संतुलित आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि डोळ्यांवरचा ताण याविषयीच्या लोकशिक्षणावर भर दिला जाईल. सध्याच्या काळात लोकांमध्ये आरोग्याबाबत जागृती वाढताना दिसत आहे. त्यादृष्टीने आरोग्यविषयक खात्रीशीर माहितीला मागणी असेल.     - डॉ. अविनाश सुपे, राज्य कोरोना टास्क फोर्स तज्ज्ञ

एनजीओंना निधीचे आव्हानसामाजिक संस्थासमोर निधी उभारण्याचे मोठे आव्हान आहे. अनेक जिल्ह्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तम काम करणाऱ्या संस्था आहेत; परंतु त्यांचे काम बेटासारखे आहे. त्यांच्यामध्ये संवादाचा, देवाणघेवाणीचा कोणताही पूल नाही. त्यामुळे नव्या वर्षात या संस्था एकत्र येऊन एकमेकांच्या अडचणीत कशा भागीदार होतील, असा प्रयत्न होवू शकतो. कोविडकाळात तंत्रकौशल्य नसल्याने व साधनसामग्रीच्या अभावामुळे शिक्षण विस्कळीत झाले. कौशल्य शिकून मुलांना शिक्षणापासून तुटू न देण्याचे आव्हान आहे.    - पी. डी. देशपांडे, अध्यक्ष, हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड संस्था, कोल्हापूर.

शेतीमध्ये संशोधन, आधुनिकीकरण शेतीला पर्याय नाही, लोकसंख्या वाढते आहे, त्या तुलनेत शेती उत्पादनही वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतीक्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यावर सरकारचा भर आहे. कमी जागेत, कमी पाण्यात व कमी कष्टात जास्त उत्पादन या धोरणावर कृषी विभाग पुढील वर्षात काम करणार आहे. त्यात प्रामुख्याने शेतीची उत्पादकता वाढविण्याकडे लक्ष दिले जाईल. हवामानाला अनुकूल अशा कृषी संशोधन व कृषी विस्तार कार्यक्रमांवर भर देण्यात येईल. शेतमजुरांच्या समस्या कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल.याशिवाय पुढील संकल्प करण्यात आले आहेत.- ठिबक व तुषार सिंचन यांद्वारे पाण्याचा सुयोग्य वापर वाढविणे.- शेतकरी उत्पादक कंपन्यांना भरीव मदत करून कृषिमालाची साठवण प्रक्रिया विपणन यावर भर देणे.- कृषी तंत्रज्ञान प्रसाराद्वारे कृषी उत्पादकता वाढ अभियान राबविणे.- पीक विमा योजना अधिक परिणामकारकरीत्या राबविणे.- डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजना अधिक परिणामकारकपणे राबविणे.    - धीरजकुमार कृषी आयुक्त

लाेकेशन तंत्रज्ञानाची जागृती व वापर वाढेल२१व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाने जगाचे चित्र झपाट्याने बदलविले. मात्र, काेराेना काळात जग थांबलेले असताना, तंत्रज्ञानाच्या उपयाेगाचा वेग प्रचंड वाढला. येत्या काळात विशेषत: साॅफ्टवेअरच्या मदतीने लाेकेशन ट्रेसिंग टेक्नॉलाॅजीचा वापर पूर्वीपेक्षा वेगाने हाेत आहे. अन्न व ग्राेसरीजच्या घरपाेच मिळणाऱ्या सुविधांचा वापर हे त्याचेच उदाहरण आहे. सॅटेलाइट इमेजरीचा ॲक्सेस सहज व साेपा हाेत असल्याने वापर वाढेल. साॅफ्टवेअर, माेबाइल ॲपद्वारे खासगी सेवा वेगाने उपलब्ध हाेतील. सरकारी कार्यालयांमध्येही हा बदल दिसेल व घरपाेच सेवांचे ॲक्सेस वाढतील. काेराेना काळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व आले असून, त्याचाही वापर वाढलेला दिसेल. नियमित शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतरही शैक्षणिक गाेष्टींत इंटरनेटचा वापर प्रचंड वाढेल. प्रदूषणमुक्त वाहन वापरण्याकडे लाेकांचा कल वाढेल.    - अजित धार्मिक, संगणक संशाेधक नागपूर

शिक्षण क्षेत्राबाबत ठोस निर्णयाची गरजकोरोना आणि आता ओमायक्रॉन यामुळे शिक्षण क्षेत्राचे प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य सरकारात एक वाक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्था चालक अशा सर्वांमध्ये संभ्रम होत आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभीच ओमायक्रॉनचे संकट दिसत असताना शासनाने जो काही निर्णय घ्यायचा तो ठोसपणे घेतला पाहिजे. भलेही हा निर्णय चुकीचा ठरला किंवा त्यावर टीका झाली तरी चालेल, परंतु निर्णय घेतला पाहिजे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घ्यायचे सरकारने जाहीर केल्याने विद्यार्थी तशीच तयारी करीत आहेत आता त्यामुळे सरकारने ठाम राहिले पाहिजे. आणि विद्यार्थी तसेच पालकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. जूनपर्यंत नक्की काय धाेरण राहील हे स्पष्ट केले पाहिजे, शालेय शिक्षणाबरोबरच महाविद्यालयाबाबतच ही असा ठोस निर्णय घेतला पाहिजे.    - प्रा. दिलीप फडके, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :agricultureशेती