शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

‘राज्यपाल हटाव’च्या चर्चेने विचित्र अनिश्चितता

By admin | Updated: June 18, 2014 04:27 IST

उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी राजीनामा दिल्याची खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुष्टी केली.

हरीष गुप्ता, नवी दिल्लीआधीच्या संपुआ सरकारने नेमलेल्या किमान सात राज्यांच्या राज्यपालांना पदे सोडण्याचे निरोप केंद्र सरकारकडून धाडण्यात आल्याचे वृत्त दिवसभर राजकीय वर्तुळात जोरात असतानाच उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी मंगळवारी राजीनामा दिला. मात्र इतर राज्यपालांपैकी किमान तिघांनी राजीनाम्याचा इन्कार केल्याने, दोघांनी राष्ट्रपतींची तर एकाने पंतप्रधानांची भेट घेतल्याने आणि विशेष म्हणजे या सर्व घडामोडींवर मोदी सरकाकडून कोणतेही अधिकृत भाष्य न करण्यात आल्याने दिवअखेर एक अनिश्चितता कायम राहिली.उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी राजीनामा दिल्याची खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुष्टी केली. मात्र इतर राज्यपालांनाही राजीनामे द्यायला सांगितले आहे का यावर ते काहीच बोलले नाहीत. पण ‘मी त्यांच्या जागी असतो तर यापूर्वीच राजीनामा दिला असता,’ असे सूचक भाष्यही त्यांनी केले. ए.के. नारायणन् (प. बंगाल), शीला दीक्षित (केरळ), मार्गारेट अल्वा (राजस्थान), कमला बेनिवाल (गुजरात), के. शंकरनारायणन् (महाराष्ट्र) आणि देवेंद्र कोनवार (त्रिपुरा) या आधीच्या सरकारने नेमलेल्या राज्यपालांना केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी फोन करून राजीनामे देण्याचे संकेत दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यामुळे मोदी सरकारने राज्यपालांना बदलण्याचा घाट घातला आहे, असे तर्कही लढविले गेले.