शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

बोईसर, पालघरमध्ये कडकडीत बंद

By admin | Updated: July 13, 2017 05:14 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ बुधवारी बोईसर व पालघरमध्ये उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ बुधवारी बोईसर व पालघरमध्ये उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामध्ये रिक्षा, हॉटेल्स, व्यापारी, व्यावसायिक सहभागी होते. एस.टी सुरु असल्याने प्रवशांना दिलासा मिळाला मात्र असंख्य कामगारांना वेळेवर कारखान्यात पोहोचता न आल्याने उद्योगांवर परिणाम झाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी सकाळी बोईसर रेल्वे स्थानकाच्या आवारात जमून हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा राज्याचे प्रमुख प्रचारक शंकर गायकर , पालघर जिल्हा संयोजक चंदन सिंह , मनदेव दुबे, यांच्या सह पालघर जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन सभापती अशोक वडे, पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील, माजी पं स सदस्य भावेश मोरे, भाजपाचे संजीव शेट्टी यांच्यासह सुमारे १५० नागरिक उपस्थित होते. डहाणूतील दोन भविकांना डहाणूकरांनी स्बोर्डी, घोलवड आणि परिसरातील नागरिकांनी विजयस्तंभ येथे एकत्र येऊन मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली. तर डहाणू शहरातील विविध भागात उषा सोनकर आणि निर्मलादेवी ठाकूर यांचे फोटो असलेले बॅनर लावून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बोईसरचे पोलीस उपविभागीय अधिकारी फत्तेसिंह पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक विजय शिंदे तारापूर व वाणगांवचे सहाय्यक निरीक्षक गोंडुराम बांगर व दीपक जोगदंड उपस्थित होते. मात्र अचानक पुकारलेल्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. >पालघरमध्ये बंदला गालबोट : हा बंद सर्वपक्षीय बंद होता. त्याचे मेसेज व बॅनर शहरात मंगळवार संध्याकाळपासून दिसू लागल्यानंतर पालघर शहरातील सर्वांनी बुधवारी सकाळपासून आपली दुकाने बंद ठेवली. औषधाची दुकाने, बँका व शासकीय कार्यालये सोडली तर सर्वत्र बंद होता. शहरात सकाळी हुतात्मा स्तंभाजवळ भाजपा व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बळी गेलेल्या दोन्ही यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र अचानक चिनी मालावर बंदी घालण्याच्या घोषणाही केलेल्या गेल्या. पाहता-पाहता यातील काही कार्यकर्त्यांनी स्तंभाजवळ बंद असलेल्या मोबाइल दुकानाच्या व देविशा दुकानाच्या फलकावर दगडफेक करून ते तोडले. >जखमींची प्रकृती स्थिरडहाणू : दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या अमरनाथ यात्रेकरूंची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होत आहेत. यशवंत डोंगरे, योगिता डोंगरे (कासा), प्रकाश वजाणी, हेमा वजाणी, पूजा गोसावी, छाया वसंत मेहेर, गीताबेन रावल, पल्लवी अभ्यंकर (सर्व डहाणूचे) यांची प्रकृती स्थिर आहे. पूजा गोसावी यांच्या कमरेत गोळी शिरल्याने त्यांच्यावर श्रीनगर येथील मिलिट्रीच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन-तीन दिवसांत त्या येथे परततील असे त्यांचे पती दिनेश गोसावी यांनी सांगितले. गीताबेन रावल यांच्या पायाला गोळी लागली असून त्या सध्या त्या येथील डॉ. देव यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जखमी दांपत्य यशवंत डोंगरे आणि सौ. योगिता डोंगरे यांच्यावर सुरत येथे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असून आमदार अमित घोडा यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन विचारपूस केली.>गीताबेन यांची आपबितीसोमवारी रात्री ८ च्या सुमारास वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. येथे शेषनाग येथे बाजारात गाडी उभी होती. अचानक गोळीबार सुरू झाला. आम्हाला असे वाटले की फटाके फुटत आहेत. परंतू आजूबाजूच्या लोकांच्या शरीरावर रक्त पाहिले तेव्हा लक्षात आले आपल्याच गाडीवर गोळीबार सुरु आहे. आम्ही सीटखाली लपलो. अतिरेक्यांनी बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना आत शिरता आले नाही. अन्यथा संपूूर्ण बसमध्ये रक्तपात घडला असता. माझ्या पायातून रक्त वाहू लागल्यानंतर मला जाणवले की गोळी लागली आहे, अशी थरारक कहाणी गीताबेन यांनी सांगितली.