शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट औषधांची विक्री थांबता थांबेना

By admin | Updated: January 20, 2015 01:36 IST

अन्न व औषधी प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतरही राज्यात निकृष्ट औषधांची विक्री थांबलेली नाही उलट ती दरवर्षी वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे स्वत:च प्रशासन काळजीत पडले आहे.

श्रीनारायण तिवारी - मुंबईअन्न व औषधी प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतरही राज्यात निकृष्ट औषधांची विक्री थांबलेली नाही उलट ती दरवर्षी वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे स्वत:च प्रशासन काळजीत पडले आहे.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा अन्न व औषध प्रशासन विभाग बराच कार्यक्षम समजला जातो तरीही खूप वरपर्यंत हात पोहोचलेल्या औषध निर्मात्या कंपन्यांनापुढे त्याने हात टेकले आहेत. अशा कंपन्यांचे हा विभाग काहीही बिघडवू शकलेला नाही. अशा कंपन्यांकडूनच निकृष्ट दर्जाच्या औषधांचा ओघ सुरूच आहे. एफडीए जास्त कार्यक्षम व कठोर होताच काही दिवस त्या औषधांचा पुरवठा कमी होतो व थोड्याच दिवसांत तो पूर्ववत होतो.एफडीएची चिंता वाढलीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एफडीएने २०१४ च्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान जेवढे नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यातील ११.१२ टक्के नमुने निकृष्ट दर्जाचे निघाले. २०१२-२०१३ मध्ये राज्यात एकूण ७५३८ औषधांचे नमुने घेण्यात आले होते त्यातील ३६० नमुने (४.७७ टक्के) निकृष्ट निघाले.२०१३-२०१४ मध्ये ६०९७ औषधांच्या नमुन्यांपैकी ४६४ (७.६४ टक्के) नमुने निकृष्ट निघाले. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान २५४३ नमुने घेण्यात आले होते त्यापैकी २८३ निकृष्ट दर्जाचे निघाले. निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्यामुळे आरोग्य मंत्रालयाची काळजी वाढली आहे. औषधेच जर चांगली नसतील तर रोगी बरा कसा होणार, असा आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. रोगी बरा झाला नाही तर डॉक्टरांना दोष दिला जातो.उपाययोजनेची तयारीया प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाजारात निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण फार मोठे असल्याच्या तक्रारी येत असल्याचे मान्य केले. आमचे अधिकारी औषधांच्या नमुन्यांची तपासणी करीत आहेत. या गोष्टीवर आणखी लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज असून नवी उपाययोजना केली जात असल्याचे भापकर म्हणाले.च्आरोग्य मंत्रालयानुसार एफडीएचे निकष न पाळणारी औषधे बाजारातच येऊ शकत नाहीत. जर अशी औषधे कोणाला फुकट वाटायची असतील तरी त्याला तसे करता येत नाही. असे करताना जर कोणी पकडला गेला तर त्याला शिक्षा होऊ शकते, कारण असे करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामुळे एफडीए वेळोवेळी मेडिकल स्टोअर्सची तपासणी करून त्यांच्याकडील औषधांचे नमुने घेत असते. च्या नमुन्यांची तपासणी एफडीए मुंबई व औरंगाबादेतील आपल्या प्रयोगशाळेतून करून घेत असते. संशय असलेल्या औषधाचा नमुना प्रसिद्ध असलेल्या जवळच्या प्रयोगशाळेत पाठवून त्याची पुन्हा तपासणी केली जाते. जे नमुने तपासणीत नापास होतात त्या बॅचची सगळी औषधे बाजारातून परत मागवून घेतली जातात व संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते.