शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निकृष्ट औषधांची विक्री थांबता थांबेना

By admin | Updated: January 20, 2015 01:36 IST

अन्न व औषधी प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतरही राज्यात निकृष्ट औषधांची विक्री थांबलेली नाही उलट ती दरवर्षी वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे स्वत:च प्रशासन काळजीत पडले आहे.

श्रीनारायण तिवारी - मुंबईअन्न व औषधी प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतरही राज्यात निकृष्ट औषधांची विक्री थांबलेली नाही उलट ती दरवर्षी वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे स्वत:च प्रशासन काळजीत पडले आहे.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा अन्न व औषध प्रशासन विभाग बराच कार्यक्षम समजला जातो तरीही खूप वरपर्यंत हात पोहोचलेल्या औषध निर्मात्या कंपन्यांनापुढे त्याने हात टेकले आहेत. अशा कंपन्यांचे हा विभाग काहीही बिघडवू शकलेला नाही. अशा कंपन्यांकडूनच निकृष्ट दर्जाच्या औषधांचा ओघ सुरूच आहे. एफडीए जास्त कार्यक्षम व कठोर होताच काही दिवस त्या औषधांचा पुरवठा कमी होतो व थोड्याच दिवसांत तो पूर्ववत होतो.एफडीएची चिंता वाढलीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एफडीएने २०१४ च्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान जेवढे नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यातील ११.१२ टक्के नमुने निकृष्ट दर्जाचे निघाले. २०१२-२०१३ मध्ये राज्यात एकूण ७५३८ औषधांचे नमुने घेण्यात आले होते त्यातील ३६० नमुने (४.७७ टक्के) निकृष्ट निघाले.२०१३-२०१४ मध्ये ६०९७ औषधांच्या नमुन्यांपैकी ४६४ (७.६४ टक्के) नमुने निकृष्ट निघाले. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान २५४३ नमुने घेण्यात आले होते त्यापैकी २८३ निकृष्ट दर्जाचे निघाले. निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्यामुळे आरोग्य मंत्रालयाची काळजी वाढली आहे. औषधेच जर चांगली नसतील तर रोगी बरा कसा होणार, असा आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. रोगी बरा झाला नाही तर डॉक्टरांना दोष दिला जातो.उपाययोजनेची तयारीया प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाजारात निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण फार मोठे असल्याच्या तक्रारी येत असल्याचे मान्य केले. आमचे अधिकारी औषधांच्या नमुन्यांची तपासणी करीत आहेत. या गोष्टीवर आणखी लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज असून नवी उपाययोजना केली जात असल्याचे भापकर म्हणाले.च्आरोग्य मंत्रालयानुसार एफडीएचे निकष न पाळणारी औषधे बाजारातच येऊ शकत नाहीत. जर अशी औषधे कोणाला फुकट वाटायची असतील तरी त्याला तसे करता येत नाही. असे करताना जर कोणी पकडला गेला तर त्याला शिक्षा होऊ शकते, कारण असे करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामुळे एफडीए वेळोवेळी मेडिकल स्टोअर्सची तपासणी करून त्यांच्याकडील औषधांचे नमुने घेत असते. च्या नमुन्यांची तपासणी एफडीए मुंबई व औरंगाबादेतील आपल्या प्रयोगशाळेतून करून घेत असते. संशय असलेल्या औषधाचा नमुना प्रसिद्ध असलेल्या जवळच्या प्रयोगशाळेत पाठवून त्याची पुन्हा तपासणी केली जाते. जे नमुने तपासणीत नापास होतात त्या बॅचची सगळी औषधे बाजारातून परत मागवून घेतली जातात व संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते.