शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आदित्य ठाकरेंच्या सभेवर दगडफेक, अंबादास दानवेंचं पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्र, केली अशी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 10:45 IST

Ambadas Danve : आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान, त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा तसेच सभेनंतर त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना औरंगाबादमधील महालगाव येथे घडली होती.

आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान, त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा तसेच सभेनंतर त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना औरंगाबादमधील महालगाव येथे घडली होती. या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरणात सुरक्षेत अक्षम्य कसूर झाली आहे याची गांभीर्यानं दखल घ्यावी, अशी मागणी करत पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

या पत्रात अंबादास दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याती महालगाव येथे ही यात्रा आली. तेव्हा तेथील ग्राम सचिवालयासमोरील मैदानावर सभा सुरू असताना तिथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तसेच सभा संपवून तिथून निघतानाही आदित्य ठाकरे यांच्या कारवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चाल करून आला. सदर प्रकरणात सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. त्याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शिंदे गटातील आमदार रेमश बोरनारे यांचा मतदासंघ असलेल्या वैजापूर तालुक्यातील महालगाव इथे आदित्य ठाकरेंच्या सभेत मोठा राडा झाला. सभेवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सभा संपवून निघताना आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला आणि गाडीवरही दगडफेक करण्यात आली. मंगळवारी माता रमाई यांची जयंती असल्याने गावात पूर्व नियोजित मिरवणूक सुरू होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाला.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेत भाषण उरकले. मात्र सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे हे कारमध्ये बसून जात असताना मिरवणुकीतील संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या पोलीस बंदीबस्तात आदित्य यांना गावाच्या बाहेर काढण्यात आले. आदित्य ठाकरे गेल्या नंतर बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस