शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

जलचळवळ उभारा; जलक्रांती होईल!

By admin | Updated: September 19, 2015 21:42 IST

पाण्याबाबतच्या कोणत्याही योजनेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलीच पाहिजे, असा नियम आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर पाण्याची उपलब्धता,

- डॉ. राजेंद्र सिंह (जलपुरुष)

पाण्याबाबतच्या कोणत्याही योजनेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलीच पाहिजे, असा नियम आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर पाण्याची उपलब्धता, पाण्याची साठवण आणि भूगर्भातील जलसाठा वाढविण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखणे गरजेचे असून, त्यासाठी महाराष्ट्रात अधिक जोमाने जलचळवळ उभारणे आवश्यक आहे; आणि असे झाले तर महाराष्ट्रात नक्कीच जलक्रांती होण्यास मदत होईल.देश असो किंवा महाराष्ट्र असो. गेल्या कित्येक वर्षांपासून दुष्काळाचा प्रश्न कायम आहे. केवळ दुष्काळाचे स्वरूप बदलते. महाराष्ट्रातल्या दुष्काळाला कित्येक समस्या कारणीभूत आहेत; आणि यापूर्वी मी अनेकवेळा राज्यातील दुष्काळाबाबत विवेचन केले आहे. दुष्काळावर मात कशी करायची याबाबतही सांगितले आहे. साधी, सोपी आणि सरळ गोष्ट, ती म्हणजे पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा. पाऊसच होत नसेल तर पाणी अडवणार कसे? असे कोणी म्हणत असेल तर मी असे म्हणेन की, प्रत्येक वर्षी होणाऱ्या पावसाचे पाणी साठविणे गरजेचे आहे. राज्यातील बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे पाण्याची साठवण आणि पाण्याचे वाटप या दोन्हीबाबत ग्रामीण भागाचा विचार प्राधान्याने गरजेचा आहे. भविष्यातील जलनियोजनासाठी जिल्हा, तालुका स्तरावर पाण्याबाबत उपाययोजना कराव्या लागतील. पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे पाणी आणि उद्योगांसाठीचे पाणी असा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. पाण्याच्या पुनर्वापराचे धोरण स्वीकारावे लागेल. गावागावांत पाणलोट क्षेत्र विकासाचे काम हाती घ्यावे लागेल. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा कार्यक्रम प्राधान्याने राबविला गेला पाहिजे. शिवाय आता जो काही पाऊस पडेल त्या पावसाचे पाणी अडवावे लागेल. ते साठवावे लागेल; शिवाय त्याच पाण्याला झिरपू द्यावे लागेल. यासाठी एक चळवळ उभी करावी लागेल. राज्यात लोकांना लोकांसाठीच जलक्रांती हाती घ्यावी लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहू नये. लोकांनी लोकांसाठी पुढाकार घेतला तर पाण्याचे नियोजन सहज होईल. फक्त त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. जलनियोजनासाठी जलसाक्षरता घ्यावी लागेल.