शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही ३५% लोक मतदानापासून दूर

By admin | Updated: September 15, 2015 01:30 IST

मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील

- संकेत सातोपे,  मुंबई मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर स्पष्ट होते. आज जागतिक लोकशाही दिनानिमित्त आढावा घेतला असता, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या १६ निवडणुकांमध्ये कधीही ७० टक्के मतदारांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट होते.गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ६६.४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या आधीच्या २००९ सालच्या निवडणुकीत केवळ ५८.१९ टक्के लोकांनी मतदान केले होते. स्वातंत्र्यापासूनचे सर्वात कमी मतदान पहिल्या दोन निवडणुकांमध्येच झाल्याचे दिसते. १९५१च्या सार्वत्रिक निवडणुकीत ४४.८७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या म्हणजे १८५७ सालच्या निवडणुकीमध्ये ४५.४४ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढून ५५ ते ६५ टक्क्यांदरम्यान राहिली आहे.जागतिक लोकशाही दिन विशेष : २०१४ला सर्वाधिक ६६ टक्के मतदानएकूण नोंदणीकृत मतदारांपैकी सरासरी केवळ 55-58% - मतदार नियमित मतदानाचा हक्क बजावतात. म्हणजेच अद्याप जवळपास निम्मा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून लांब आहे. त्यातही नोंदणी झालेली नसलेल्या पात्र नागरिकांची गणना केलेली नाही अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. आता इतक्या मोठ्या वर्गाला मतदान प्रक्रियेत सामावून घेण्याचे आव्हान शासकीय-प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे.