शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

अजूनही ३५% लोक मतदानापासून दूर

By admin | Updated: September 15, 2015 01:30 IST

मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील

- संकेत सातोपे,  मुंबई मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर स्पष्ट होते. आज जागतिक लोकशाही दिनानिमित्त आढावा घेतला असता, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या १६ निवडणुकांमध्ये कधीही ७० टक्के मतदारांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट होते.गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ६६.४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या आधीच्या २००९ सालच्या निवडणुकीत केवळ ५८.१९ टक्के लोकांनी मतदान केले होते. स्वातंत्र्यापासूनचे सर्वात कमी मतदान पहिल्या दोन निवडणुकांमध्येच झाल्याचे दिसते. १९५१च्या सार्वत्रिक निवडणुकीत ४४.८७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या म्हणजे १८५७ सालच्या निवडणुकीमध्ये ४५.४४ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढून ५५ ते ६५ टक्क्यांदरम्यान राहिली आहे.जागतिक लोकशाही दिन विशेष : २०१४ला सर्वाधिक ६६ टक्के मतदानएकूण नोंदणीकृत मतदारांपैकी सरासरी केवळ 55-58% - मतदार नियमित मतदानाचा हक्क बजावतात. म्हणजेच अद्याप जवळपास निम्मा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून लांब आहे. त्यातही नोंदणी झालेली नसलेल्या पात्र नागरिकांची गणना केलेली नाही अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. आता इतक्या मोठ्या वर्गाला मतदान प्रक्रियेत सामावून घेण्याचे आव्हान शासकीय-प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे.