शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

चिमुकल्यांवरील अत्याचाराचा कलंक

By admin | Updated: July 23, 2014 00:15 IST

समाजात फोफावत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण होरपळत जाण्याची विदारक परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्रातही दिसत आहे.

हिनाकौसर खान-पिंजार  पुणो
समाजात फोफावत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण होरपळत जाण्याची  विदारक परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्रातही दिसत आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य हे लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये देशात तिस:या क्रमांकावर आहे. असुरक्षित बालपणासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तर, शहरांनुसार दिल्लीनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक बाल अत्याचाराचे प्रमाण आहे. 
 मागील वर्षभरात लहान मुलांवर बलात्कार, लैगिंक अत्याचार, अपहरण आणि खून हे प्रकार वाढले असून, राज्यात 6,14क् गुन्हे राज्यात घडले आहेत. मुळात बाल अत्याचारा सारख्या किती तरी गुन्ह्यात पालक पुढे येत नाहीत, तर कितीतरी 
गुन्ह्यात पालकांचे तोंड बंद केले 
जाते. काहीवेळा ‘तडजोड’देखील होते, अशा गुन्ह्यांची तर गणतीच नाही. त्यामुळे सद्य:स्थितीतील दाखल आकडेवारीसुद्धा पुढारलेल्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असून, बाल अत्याचाराची भीषणता स्पष्ट करणारी आहे.
बालकांविरुद्धच्या गुन्ह्यात  प्रलंबित खटल्यांसह पोलीस तपासासाठी दाखल असणारा महाराष्ट्रात तब्बल 8,652 गुन्हे इतका मोठा आकडा असून, याबाबत उत्तर प्रदेशच्या 1क् हजार 375 गुन्ह्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत आहे. याशिवाय मागील वर्षाअखरे राज्यातील प्रलंबित खटल्यांची परिस्थिती ही इतर राज्यांच्या तुलनेत दयनीय असल्याचे दिसत 
आहे. तब्बल 3 हजार 686 गुन्ह्यांचा पोलीस तपास होऊन निपटारा होणो बाकी आहे.
 याशिवाय 2क्13 मध्ये राज्यातील 22 हजार 262 तक्या खटल्यांची न्यायालयात सुनावणी झाली असून, 
हा देशातील सर्वात मोठा आकडा आहे. यापैकी केवळ 119 खटल्यांमध्ये शिक्षा लागली असून, 875 मध्ये 
आरोपींची सुटका झाली आहे, तर तब्बल 21 हजार 255 खटले प्रलंबित आहेत. 
ही आकेडवारी सकरात्मक व नकारात्मक दोन बाबी दर्शवत आहेत. कायद्याचे ज्ञान वाढले, जागरूकता वाढली, त्यामुळे गुन्हे समोर येत आहेत. न्यायासाठी लढत असल्याचे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे माराहाणीसारखे प्रकार मोठय़ांच्या अतितणावातून घडत आहेत. ‘पालक-बालक संवादा’च्या अभावातून गुन्हेगारी वाढत आहे. बालकांना आश्वासक वाटण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन नाही. गुन्हेगारीप्रवत्तीलाच आळा घालण्यासाठी ऊर्जा सकारात्मक वापरण्याचे पर्याय लहानपणापासूनच दिले पाहिजेत. 
- अनुराधा सहस्रबुद्धे, 
संचालिका, ज्ञानदेवी संचलित चाईल्डलाईन.
 
मुंबई दुस:या, पुणो सहाव्या क्रमांकाचे शहर
लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये शहरांनुसार वेगळ्या केलेल्या आकडेवारीत दिल्लीनंतर मुंबईमध्येही या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दिल्लीत 6,124 गुन्हे, तर मुंबईमध्ये 9क्2 गुन्हे दाखल आहेत. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, इंदौर आणि रायपूर या शहरांनंतर पुण्यातही गुन्हे वाढीस लागल्याचे चित्र आहे. मागच्या वर्षात पुण्यात 44क् गुन्हे दाखल झाले आहेत.