शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

उत्पन्न वाढवण्यासाठी एसटीची ‘लगीनघाई’

By admin | Updated: April 29, 2016 03:02 IST

उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्तांचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्तांचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी हे मुहूर्त असल्याने महामंडळाकडून एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा वाहतूक आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याबाबतचे आदेशच विभाग नियंत्रक आणि अन्य अधिकाऱ्यांना महामंडळाकडून देण्यात आले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात घट होऊन २0१६ च्या पहिल्या तीन महिन्यांत एसटी महामंडळाला ३0 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. मात्र १५ एप्रिलपासून एसटीचे भारमान थोडेफार वाढत असून लग्नमुहूर्त आणि शाळांना सुटी असल्याचा फायदा महामंडळाला मिळत आहे. २0 एप्रिलपासून एसटीचे दररोजचे सरासरी उत्पन्न १८ कोटी रुपये असून पुढील दोन ते तीन दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी महामंडळाने ३0 एप्रिल आणि १ मे या मोसमातील लग्नाच्या शेवटच्या दोन मुहूर्तांचा फायदा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही दिवशी बहुतांश लांब पल्ल्याच्या बसचे आरक्षण फुल झाले आहे. ज्या मार्गांवर आरक्षण फुल झाले आहे अशा मार्गांवर प्रवासी गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी मुख्य बस स्थानके, निवारा केंद्रे व बसथांब्यांवर एसटी कर्मचारी व अधिकारी ‘प्रवासी मित्र’ म्हणून कार्यरत राहतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, कोल्हापूर, सांगली या मुख्य बस स्थानकांतून पहाटे आपापल्या गावी जाण्यासाठी गावी जाणाऱ्या (स्थानिक) जादा बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत.