शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

'पुस्तकांचे गाव ' ला योजनेचा दर्जा : आगामी काळात योजनेची व्याप्ती वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:06 IST

मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व संस्कृतीची जोपासनी व्हावी तसेच भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी या उददेशाने भिलार येथे 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना आकारास आली.

ठळक मुद्देपुस्तकांच्या गावातील विविध दालनांना वाचक आणि पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणावर भेटी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उपक्रमाला योजना म्हणून कार्यान्वित करण्यास मान्यता

नम्रता फडणीसपुणे : 'हे ऑन वे ' या वेल्स ( इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर भिलार येथे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या 'पुस्तकांचे गाव ' या उपक्रमाला योजनेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार आगामी काळात या योजनेची व्याप्ती वाढविली जाणार आहे.  हा उपक्रम योजनेच्या स्वरूपात कार्यान्वित झाल्यामुळे मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय तो बंद करता येणार नाही. मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व संस्कृतीची जोपासनी व्हावी तसेच भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी या उददेशाने भिलार येथे 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना आकारास आली. त्यानुसार  तेथील स्थानिक जनतेच्या सहभागातून वाडमयातील विविध विषयानुरूप पुस्तकांची दालने विकसित करण्यात आली.  4 मे 2017 रोजी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  शासन आणि लोकसहभागातून साकार झालेल्या पुस्तकांच्या गावातील विविध दालनांना दोन वर्षात वाचक आणि पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या . 'पुस्तकांचे गाव'ला मिळत असलेला हा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन  हा उपक्रम स्वतंत्रपणे योजना म्हणून राबविण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता. त्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उपक्रमाला योजना म्हणून कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी  ' लोकमत' शी बोलताना दिली.ते म्हणाले, या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्षकांतर्गत सुमारे दीड कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, योजनेच्या व्यवस्थापनासाठी प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहायक, कार्यालयीन सहायक, लिपीक टंकलेखक आणि शिपाई अशा पदांची भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन पुस्तकांचे गाव भिलार येथे आगामी काळात अधिक व्यापक दृष्टीकोनातून विविध साहित्यिक उपक्रम, साहित्य प्रकाशन, कार्यशाळा तसेच पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, साहित्य जत्रा, मान्यवर साहित्यिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे.तसेच  पर्यटकांच्या सोयीसाठी खुल्या प्रेक्षागृहाचे व्यवस्थापन, समूह निवा-याची सोय, स्वच्छतागृहाचे बांधकाम, वाहनतळ, रस्ते दुरूस्ती, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. कोणताही उपक्रम पाच ते सहा वर्ष चालविला तर तो बंद करता येणे शक्य होते. पण आता या उपक्रमाचे रूपांतर योजनेमध्ये झाल्यामुळे तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय बंद करता येणार नाही. ----------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यGovernmentसरकार