शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्याचे नवे सागरी विकास धोरण लवकरच

By यदू जोशी | Updated: June 23, 2023 07:14 IST

२०१९ मध्ये धोरणात काही दुरुस्ती करण्यात आल्या होत्या. मूळ धोरणाची मुदत २०२१ मध्येच संपली होती. 

मुंबई : राज्य सरकार लवकरच नवे सागरी विकास धोरण आणणार आहे. त्यात, भाडेपट्ट्यावर जमिनी देतानाच्या सवलती, फ्लोटेल्सच्या, ॲम्फिबियन बसेस, हाऊस बोटस् आणि सीप्लेन्सच्या तिकीट दरात सवलत आदींचा समावेश असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या धोरणाला मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 खासगी बंदरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग अशा सुविधा निर्माण करणे, क्रूझवर सवलती देणे आदींचा या धोरणात समावेश असेल. शेजारच्या गुजरातशी स्पर्धा करताना सुविधा आणि सवलतींचे पॅकेज देण्यावर भर असेल. हे धोरण पाच २०२८ पर्यंत लागू असेल. यापूर्वी २०१६ मध्ये तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने असे धोरण आणले होते. २०१९ मध्ये धोरणात काही दुरुस्ती करण्यात आल्या होत्या. मूळ धोरणाची मुदत २०२१ मध्येच संपली होती. 

समुद्रातील लाईट हाऊसेस तसेच पर्यटन स्थळांचा विकास, वॉटर स्पोर्ट्स आणि इतर  सुविधांची उभारणी करणे, तीन वर्षांसाठी प्रवाशांना क्रूझच्या तिकीट दरात ७५ टक्क्यांपर्यंत सवलत, बंदरांच्या वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात २५ टक्के सवलत ही या धोरणाची आणखी काही वैशिष्ट्ये असतील. फ्लोटेल्स, सी प्लेन, हाऊसबोट्सना चालना देण्यासाठी  प्रवासी आणि मालक या दोघांनाही सवलतींचे पॅकेज दिले जाणार आहे. 

- खासगी बंदरांच्या मालकांना सवलती देण्याचेही या धोरणात प्रस्तावित आहे. या बंदरांपर्यंत जाणारे रस्ते बांधण्यासाठी ५० टक्के अर्थसहाय्य राज्य सरकार करेल. या बंदरांना रेल्वेने जोडले जावे यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल. - कच्चा माल आणि तयार वस्तूंची वाहतूक समुद्रामार्गे व्हावी यावर धोरणात भर देण्यात आला आहे. - नवीन जहाजांची बांधणी आणि जुन्या जहाजांच्या काही सुट्या भागांचा वापर करून पुन्हा त्यांची उभारणी करणे यासाठीही सवलती दिल्या जातील. बोटी उभ्या करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म (मरिना) उभारण्यासाठीची जागा ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या जातील.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र