शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

राज्यात आता येणार नवे कृषी शिक्षण धाेरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:04 IST

उच्चस्तरीय समितीचे काम सुरू; एकसूत्रता, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यावर भर

- राजरत्न सिरसाटअकाेला : कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने कृषी शिक्षणाचे पुढील २५ वर्षांचे नवे धाेरण निश्चित करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने कामही सुरू केले आहे. अलीकडच्या पाच-सात वर्षांत कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. ६० हजार जागांसाठी लाखाे विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात.राज्यात एकूण चार कृषी विद्यापीठे असून, पदविका, पदव्युत्तर व आचार्य पदवी मिळून प्रत्येक विद्यापीठात १५ ते १६ हजार म्हणजेच राज्यात ६० ते ७० हजार विद्यार्थी कृषीतील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात. विशेष म्हणजे सीईटी आणि नीट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाताे. याच शिक्षणात एकसूत्रता, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी नवे कृषी शिक्षण ठरविण्यात येणार आहे. यात अनेक बाबी नव्याने ठरवण्यात येतील.अशी आहे समितीमाजी कुलगुरू डाॅ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीत दापाेलीच्या डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. एस. एस. मगर, अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) डाॅ. डी. एल. साळे, परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) डाॅ. विलास पाटील व डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान अधिष्ठाता (कृषी) डाॅ. सतीश नारखेडे हे सदस्य असून, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान अधिष्ठाता (कृषी) तथा अध्यक्ष, संचालक शिक्षण समन्वय समिती डाॅ. अशाेक फरांदे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.समितीने काम सुरू केले असून, एक बैठक झाली आहे. दुसरी बैठक पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. शेतीशी निगडित विद्यार्थ्याला हे शिक्षण सुुलभरीत्या घेता यावे, असा मानस आहे.- डाॅ. एस. एन. पुरी, अध्यक्ष, कृषी शिक्षण धाेरण उच्चस्तरीय समिती.

टॅग्स :agricultureशेती