शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राज्यात आता येणार नवे कृषी शिक्षण धाेरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:04 IST

उच्चस्तरीय समितीचे काम सुरू; एकसूत्रता, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यावर भर

- राजरत्न सिरसाटअकाेला : कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने कृषी शिक्षणाचे पुढील २५ वर्षांचे नवे धाेरण निश्चित करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने कामही सुरू केले आहे. अलीकडच्या पाच-सात वर्षांत कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. ६० हजार जागांसाठी लाखाे विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात.राज्यात एकूण चार कृषी विद्यापीठे असून, पदविका, पदव्युत्तर व आचार्य पदवी मिळून प्रत्येक विद्यापीठात १५ ते १६ हजार म्हणजेच राज्यात ६० ते ७० हजार विद्यार्थी कृषीतील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात. विशेष म्हणजे सीईटी आणि नीट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाताे. याच शिक्षणात एकसूत्रता, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी नवे कृषी शिक्षण ठरविण्यात येणार आहे. यात अनेक बाबी नव्याने ठरवण्यात येतील.अशी आहे समितीमाजी कुलगुरू डाॅ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीत दापाेलीच्या डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. एस. एस. मगर, अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) डाॅ. डी. एल. साळे, परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) डाॅ. विलास पाटील व डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान अधिष्ठाता (कृषी) डाॅ. सतीश नारखेडे हे सदस्य असून, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान अधिष्ठाता (कृषी) तथा अध्यक्ष, संचालक शिक्षण समन्वय समिती डाॅ. अशाेक फरांदे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.समितीने काम सुरू केले असून, एक बैठक झाली आहे. दुसरी बैठक पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. शेतीशी निगडित विद्यार्थ्याला हे शिक्षण सुुलभरीत्या घेता यावे, असा मानस आहे.- डाॅ. एस. एन. पुरी, अध्यक्ष, कृषी शिक्षण धाेरण उच्चस्तरीय समिती.

टॅग्स :agricultureशेती