शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

राज्यात आता येणार नवे कृषी शिक्षण धाेरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:04 IST

उच्चस्तरीय समितीचे काम सुरू; एकसूत्रता, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यावर भर

- राजरत्न सिरसाटअकाेला : कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने कृषी शिक्षणाचे पुढील २५ वर्षांचे नवे धाेरण निश्चित करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने कामही सुरू केले आहे. अलीकडच्या पाच-सात वर्षांत कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. ६० हजार जागांसाठी लाखाे विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात.राज्यात एकूण चार कृषी विद्यापीठे असून, पदविका, पदव्युत्तर व आचार्य पदवी मिळून प्रत्येक विद्यापीठात १५ ते १६ हजार म्हणजेच राज्यात ६० ते ७० हजार विद्यार्थी कृषीतील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात. विशेष म्हणजे सीईटी आणि नीट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाताे. याच शिक्षणात एकसूत्रता, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी नवे कृषी शिक्षण ठरविण्यात येणार आहे. यात अनेक बाबी नव्याने ठरवण्यात येतील.अशी आहे समितीमाजी कुलगुरू डाॅ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीत दापाेलीच्या डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. एस. एस. मगर, अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) डाॅ. डी. एल. साळे, परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) डाॅ. विलास पाटील व डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान अधिष्ठाता (कृषी) डाॅ. सतीश नारखेडे हे सदस्य असून, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान अधिष्ठाता (कृषी) तथा अध्यक्ष, संचालक शिक्षण समन्वय समिती डाॅ. अशाेक फरांदे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.समितीने काम सुरू केले असून, एक बैठक झाली आहे. दुसरी बैठक पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. शेतीशी निगडित विद्यार्थ्याला हे शिक्षण सुुलभरीत्या घेता यावे, असा मानस आहे.- डाॅ. एस. एन. पुरी, अध्यक्ष, कृषी शिक्षण धाेरण उच्चस्तरीय समिती.

टॅग्स :agricultureशेती