शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट पण त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करु - मुख्यमंत्री

By admin | Updated: December 16, 2015 17:37 IST

राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट उभे राहिलेल आहे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुष्काळ, शेतकर्‍यांचे प्रश्‍न या विषयावर झालेल्या चर्चेला विधानसभेत मुख्यमंत्री उत्तर देत होते.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. १६ - राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट उभे राहिलेल आहे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुष्काळ, शेतकर्‍यांचे प्रश्‍न या विषयावर झालेल्या चर्चेला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. पावसामध्ये मोठ्या प्रमाणात खंड पडल्यामुळे राज्यावर हे संकट उभे ढाकले आहे. जलसंपदा योजणा वेळेवर राबवली असती तर राज्यावर ही वेळ आली नसती असा टोला मुख्यमंत्र्यानी विरोधकाला लगावला.
 
शेतीतील गुंतवणूक वाढवली पाहिजे, नव्या आर्थिक वर्षात ८२.२७ लाख शेतकरी विम्याच्या कक्षेत आले आहेत तर ६१,२३,२५९ शेतकरी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असून, आतापर्यंत १ लाख मेट्रिक टनाहून अधिक धान्य वाटप करण्यात आले आहे. राज्यातील ६२०० गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या विविध कामांच्या माध्यमातून २४ टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला, आत्ता जलयुक्त शिवार अंतर्गत आमदारांच्या अध्यक्षतेत तालुका पातळीवर समित्या स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगीतले. 
 
राज्यावर दुष्काळाचं संकट आलेल आहे, मराठवाड्यात फक्त १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राज्यातील ४० हजार जणावरं छावण्यात आहेत. तर साडेसात लाख विद्यार्थ्यांचं शालेय शुल्क माफ केलं आहे. यापूर्वी केवळ १ लाख रूपये नुकसानभरपाई पोटी मिळायचे आता त्याऐवजी २ लाख रूपये मिळणार आहेत . सरकारने जाहीर केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ मिळत आहे. गेल्यावर्षीपेक्षा कर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत ६.५ लाखांची वाढ झाली असून कर्जाच्या रकमेत ४१२९ कोटी रुपयांची वाढ झाल्याच त्यांनी हिवाळी अधिवेशनातील दुष्काळ, शेतकर्‍यांचे प्रश्‍न या विषयावर झालेल्या चर्चेला सांगीतले.
 मुख्यमंत्र्याच्या भाषणातील ठळक मुद्दे - 
- राजीव गांधी जीवनदायी योजना जाहीर केल्यापासून आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये २४११८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला 
- गेल्या वर्षांत ४९ हजार विहिरी बांधण्यात आल्या. यापूर्वी केवळ एका वर्षात १६ हजार विहिरी बांधल्या जायच्या 
- आता मागेल त्याला शेततळे 
- जलयुक्त शिवारसाठी आणखी ५००० गावांची निवड करण्यात आली, जनसहभाग देणाऱ्या गावांचा आणखी समावेश करणार
- सरकारने जाहीर केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ
-  परीक्षा शुल्क माफी यातून शेतकरी कुटुंबातील सुमारे ९.५ लाख विद्यार्थ्यांना ४० कोटींचा दिलासा मिळाला आहे
- दुष्काळ कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट दिल्याने १९,४५,१२३ शेतकरी लाभार्थी,सुमारे ३५३ कोटी रूपये लाभ दिला