शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मुंबईसह राज्य तापले, नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:42 IST

मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे.

मुंबई / माणगाव : मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भिराचे कमाल तापमान ४२ अंशावर गेले असून, मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. बुधवारसह गुरुवारी वाढत्या कमाल तापमानासह कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर घामाघूम होत असून, उत्तरोत्तर यात आणखी वाढ होणार आहे. वातावरणातल्या या ‘ताप’दायक बदलाने संपूर्ण महाराष्ट्र तापला असल्याचे चित्र आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील शुक्रवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.>भिरा ४२ अंशावर : रायगड जिल्ह्यातील भिरा येथे शुक्रवारी सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्च २०१७ मध्ये रायगड जिल्ह्यातील भिरा येथे नोंद करण्यात आलेल्या ४६.५ अंश सेल्सिअस अशा देशातील उच्चतम तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुरुवारी येथील तापमान ४०.५ सेल्सिअस होते. शुक्रवारी ते ४० अंश सेल्सिअस इतके होते. तर, मंगळवारी भिरा येथे सर्वाधिक अशा ४२ अंश सेल्सिअस झाल्याची माहिती मुंबई येथील मेट्रॉलॉजिकल विभागाने दिली आहे. यापूर्वी २७ एप्रिल २००५ रोजी भिरा येथे गेल्या १३ वर्षांतील सर्वाधिक अशा ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात