शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

मुंबईसह राज्य तापले, नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:42 IST

मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे.

मुंबई / माणगाव : मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भिराचे कमाल तापमान ४२ अंशावर गेले असून, मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. बुधवारसह गुरुवारी वाढत्या कमाल तापमानासह कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर घामाघूम होत असून, उत्तरोत्तर यात आणखी वाढ होणार आहे. वातावरणातल्या या ‘ताप’दायक बदलाने संपूर्ण महाराष्ट्र तापला असल्याचे चित्र आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील शुक्रवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.>भिरा ४२ अंशावर : रायगड जिल्ह्यातील भिरा येथे शुक्रवारी सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्च २०१७ मध्ये रायगड जिल्ह्यातील भिरा येथे नोंद करण्यात आलेल्या ४६.५ अंश सेल्सिअस अशा देशातील उच्चतम तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुरुवारी येथील तापमान ४०.५ सेल्सिअस होते. शुक्रवारी ते ४० अंश सेल्सिअस इतके होते. तर, मंगळवारी भिरा येथे सर्वाधिक अशा ४२ अंश सेल्सिअस झाल्याची माहिती मुंबई येथील मेट्रॉलॉजिकल विभागाने दिली आहे. यापूर्वी २७ एप्रिल २००५ रोजी भिरा येथे गेल्या १३ वर्षांतील सर्वाधिक अशा ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात