शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन महिन्यांत १६ हजार विहिरी, सिंचन क्षेत्र वाढीस मिळणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 07:08 IST

मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला.

 - विशाल सोनटक्के नांदेड - मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला. नांदेडमध्ये तीन महिन्यात ८८६ विहिरींचे म्हणजेच उद्दिष्टांच्या ६६.७७ टक्के काम पूर्ण झाले आहे.समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रम राबविण्यात येतो. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या विहिरींची कामे करण्यात येतात. ३१ मार्च अखेर राज्यात ४१ हजार ६६१ विहिरींची कामे पूर्ण झाली होती तर ७६ हजार ६८९ विहिरींची कामे प्रगतीपथावर होती. प्रगतीपथावर असलेल्या विहिरींच्या कामांचा आढावा घेतला असता काही विहिरींचे काम २५ टक्के, काहींचे ५० तर काहींचे ७५ टक्के काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले होते. यावर रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी अपूर्ण विहिरींच्या कारणांचा शोध घेवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणीचे निराकरण करा, अशी सूचना करीत अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे आदेश होते. यानुसार प्रगतीपथावरील ७५ टक्के काम झालेल्या विहिरी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. त्यानंतर ५० टक्के काम झालेल्या विहिरींचे काम हाती घेण्यास सांगण्यात आले होते. सदर मोहीम राज्यभरात १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत राबविण्याचे निश्चित करण्यात आले.एप्रिल, मे आणि जून या कालावधीत राज्यभरातील अपूर्ण विहिरींच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. महिनानिहाय प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्टही देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार रोहयोच्या माध्यमातून राज्यभरात विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. एप्रिलमध्ये राज्यभरात ४ हजार ७५५ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली तर मे महिन्यात ६ हजार ३२ विहिरी पूर्ण झाल्या. जूनमध्येही विहिरींच्या पूर्णत्वाचा हा कार्यक्रम सुरूच होता. या महिन्यात ५ हजार ३६० विहिरी बांधण्यात आल्या. यानुसार मागील तीन महिन्यात राज्यात १६ हजार १४७ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याने सर्वाधिक १ हजार ९७० म्हणजेच उद्दिष्टाच्या ८६.५२ टक्के विहिरींची कामे पूर्ण करुन राज्यात अव्वल क्रमांक पटकावला तर दुसऱ्या क्रमांकावर नांदेड जिल्हा राहिला.कोटसिंचन विहिरींची अपूर्ण असलेली जास्तीत जास्त कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य होते. यासाठी नियोजनबद्ध परिश्रम घेतल्याने जिल्ह्यात ९ जुलै पर्यंत ९६१ कामे पूर्ण करण्यात यश मिळाले. किनवट, लोहा, माहूरसह नायगाव तालुक्यात मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.-कल्पना क्षीरसागरउपमुख्य कार्यकारी अधिकारीमनरेगा, नांदेड.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNandedनांदेड