शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन महिन्यांत १६ हजार विहिरी, सिंचन क्षेत्र वाढीस मिळणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 07:08 IST

मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला.

 - विशाल सोनटक्के नांदेड - मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला. नांदेडमध्ये तीन महिन्यात ८८६ विहिरींचे म्हणजेच उद्दिष्टांच्या ६६.७७ टक्के काम पूर्ण झाले आहे.समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रम राबविण्यात येतो. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या विहिरींची कामे करण्यात येतात. ३१ मार्च अखेर राज्यात ४१ हजार ६६१ विहिरींची कामे पूर्ण झाली होती तर ७६ हजार ६८९ विहिरींची कामे प्रगतीपथावर होती. प्रगतीपथावर असलेल्या विहिरींच्या कामांचा आढावा घेतला असता काही विहिरींचे काम २५ टक्के, काहींचे ५० तर काहींचे ७५ टक्के काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले होते. यावर रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी अपूर्ण विहिरींच्या कारणांचा शोध घेवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणीचे निराकरण करा, अशी सूचना करीत अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे आदेश होते. यानुसार प्रगतीपथावरील ७५ टक्के काम झालेल्या विहिरी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. त्यानंतर ५० टक्के काम झालेल्या विहिरींचे काम हाती घेण्यास सांगण्यात आले होते. सदर मोहीम राज्यभरात १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत राबविण्याचे निश्चित करण्यात आले.एप्रिल, मे आणि जून या कालावधीत राज्यभरातील अपूर्ण विहिरींच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. महिनानिहाय प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्टही देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार रोहयोच्या माध्यमातून राज्यभरात विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. एप्रिलमध्ये राज्यभरात ४ हजार ७५५ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली तर मे महिन्यात ६ हजार ३२ विहिरी पूर्ण झाल्या. जूनमध्येही विहिरींच्या पूर्णत्वाचा हा कार्यक्रम सुरूच होता. या महिन्यात ५ हजार ३६० विहिरी बांधण्यात आल्या. यानुसार मागील तीन महिन्यात राज्यात १६ हजार १४७ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याने सर्वाधिक १ हजार ९७० म्हणजेच उद्दिष्टाच्या ८६.५२ टक्के विहिरींची कामे पूर्ण करुन राज्यात अव्वल क्रमांक पटकावला तर दुसऱ्या क्रमांकावर नांदेड जिल्हा राहिला.कोटसिंचन विहिरींची अपूर्ण असलेली जास्तीत जास्त कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य होते. यासाठी नियोजनबद्ध परिश्रम घेतल्याने जिल्ह्यात ९ जुलै पर्यंत ९६१ कामे पूर्ण करण्यात यश मिळाले. किनवट, लोहा, माहूरसह नायगाव तालुक्यात मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.-कल्पना क्षीरसागरउपमुख्य कार्यकारी अधिकारीमनरेगा, नांदेड.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNandedनांदेड