शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

राज्याला ‘शाही’स्नान!

By admin | Updated: September 19, 2015 04:55 IST

गणरायाच्या आगमनानंतर ऋषिपंचमीचा मुहूर्त साधून आलेल्या सिंहस्थातील तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीत वरुणराजाने आभाळमाया दाखवून अवघ्या महाराष्ट्राला

मुंबई : गणरायाच्या आगमनानंतर ऋषिपंचमीचा मुहूर्त साधून आलेल्या सिंहस्थातील तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीत वरुणराजाने आभाळमाया दाखवून अवघ्या महाराष्ट्राला शाहीस्नान घातले आणि गौरीचीही पाऊलवाट ओली केली. आगमनाच्या तिथीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने परतीच्या प्रवासात आपली मूठ सैल केल्याने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला, तर राज्यातील बहुसंख्य भागातील धरणसाठे तुडुंब भरल्याने वर्षभराची तहानही भागली जाण्याची अपेक्षा आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने महाराष्ट्र भिजला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना तसेच खान्देशासह अमरावती विभागातील ५५ पैकी ३७ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. नाशिक, नगर, सातारा जिल्ह्यातही पावसाने दिवसभर दमदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील धामारी येथे ओढ्याला पूर आल्याने सातवीतील विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमरावती विभागातील सहा धरणे तसेच भंडाऱ्यातील गोसेखुर्द, चंद्रपूरमधील इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पावसाची पर्वणी !शुक्रवारी पहाटेपासूनच नाशिकमध्ये दिवसभर संततधार सुरूच असल्याने साधू-महंतांची शाही मिरवणूक, शाहीस्नान व भाविकांचे स्नान पावसातच पार पडले; मात्र त्यामुळे भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. एका अर्थाने सिंहस्थातील तिसरी पर्वणी पावसानेच गाजविली.आपत्कालीन तयारीनाशिक, पुणे येथे एनडीआरएफची हेलिकॉप्टर्स व सी-बोट्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक येथील धावपट्टीवर ३, तर पुण्यात २ हेलिकॉप्टर्स तयार ठेवण्यात आली आहेत. औरंगाबाद किंवा मराठवाड्यात मदतकार्य पोहोचण्यासाठी त्यांना ३० ते ३५ मिनिटांचा वेळ लागेल.रब्बीला दिलासासर्वदूर चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामाला त्याचा चांगला फायदा होईल. फळबागा, खरिपातील कापूस व तूर पिकांनाही या पावसाचा उपयोग होईल, असे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मुंबई - पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडलीपुण्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने रौद्ररूप धारण केल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग व पुणे-लोणावळा लोहमार्गावर पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. खंडाळा विभागात ७ ठिकाणी अपघात झाले़ कामशेत ते वडगाव भागात राष्ट्रीय महामार्गावर चार ते पाच फू ट पाणी साचले होते़ एकवीरा देवीच्या गडावर दोन ठिकाणी दरड कोसळली. पावसाचे पाणी पायऱ्यांवरून वाहू लागल्याने अनेक भाविक व पर्यटक अडकून पडले होते़ धरणांतील पाणीसाठ्यात वाढ पुण्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने शेतातील पिकेही तरारून आली आहेत. खडकवासला प्रणालीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. जुन्नर तालुक्यात नाणेघाट परिसरात काही साकव वाहून गेल्याने आठ-दहा गावांचा संपर्क तुटला आहे. मिना नदीवरील बंधाऱ्यांचे ठापे न काढल्याने नदीत आलेल्या पाण्याच्या फुगवट्यामुळे बेलसर येथील काही घरांमध्ये व मंदिरात पाणी शिरले. त्यामुळे या कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.जायकवाडीसाठीपाणी सोडलेनांदूरमधमेश्वरमधील जलसाठा वाढल्याने दुपारनंतर धरणातील १० हजार ७०० क्युसेस पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडण्यात आले. शुक्रवारी दुपारपर्यंत गंगापूर धरणात ६२ टक्केइतका साठा होता. पाऊस कोसळतच असल्याने धरणसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे खात्याचे अभियंता राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली आहे.विदर्भात चौघे पुरात वाहून गेलेविदर्भात लागोपाठ दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपूरसह पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. अमरावती व भंडारा जिल्ह्यात एक आणि गोंदियात दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. अमरावतीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.