शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

राज्यात मुसळधार कायम!

By admin | Updated: July 13, 2016 04:12 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पडणारा मुसळधार पाऊस मंगळवारी कायम होता. मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पाऊस झाला

मुंबई/पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पडणारा मुसळधार पाऊस मंगळवारी कायम होता. मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पाऊस झाला. पंचगंगेला पूर आल्याने कोल्हापूरचा शंभराहून अधिक गावांचा तसेच तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आलेआहे. उर्वरित राज्यातही दमदार पाऊस होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली़ कोल्हापूर, सांगली, सातारा भागात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. पंचगंगा नदीने धोक्याची ४३ फुटांची जलपातळी ओलांडली असून महापुराच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. कोल्हापूरचा सुमारे शंभराहून अधिक गावांचा तसेच तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले आहे. सांगलीत कृष्णेचे पाणी पात्राबाहेर पडले. शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून २० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिराळ्यात मोरणा नदीसही पूर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या निफाड आणि दिंडोरी तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या अकरा जणांपैकी नऊ जणांची सुटका करण्यात यश आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाबळेश्वरात धुवांधारगेल्या २४ तासांत राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक २८७ मिमी पावसाची नोंद झाली़ तसेच किनवट १७५, तलासरी १३६, माहूर १२६, भिरा ११०, हरणाई ८९मिमी पाऊस झाला़ घाटमाथावरील कोयना (नवजा) ३४०, दावडी २२०, शिरगाव २०, ताम्हिणी १८०, डुंगरवाडी, कोयना (पोफळी) १४०, खंद १२०, भिरा ११०, अम्बोली १००, लोणावळा ८० मिमी पाऊस झाला़मुसळधार पावसाचा इशारापुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रा,कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.