शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

राज्यात मुसळधार कायम!

By admin | Updated: July 13, 2016 04:12 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पडणारा मुसळधार पाऊस मंगळवारी कायम होता. मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पाऊस झाला

मुंबई/पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पडणारा मुसळधार पाऊस मंगळवारी कायम होता. मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पाऊस झाला. पंचगंगेला पूर आल्याने कोल्हापूरचा शंभराहून अधिक गावांचा तसेच तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आलेआहे. उर्वरित राज्यातही दमदार पाऊस होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली़ कोल्हापूर, सांगली, सातारा भागात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. पंचगंगा नदीने धोक्याची ४३ फुटांची जलपातळी ओलांडली असून महापुराच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. कोल्हापूरचा सुमारे शंभराहून अधिक गावांचा तसेच तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले आहे. सांगलीत कृष्णेचे पाणी पात्राबाहेर पडले. शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून २० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिराळ्यात मोरणा नदीसही पूर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या निफाड आणि दिंडोरी तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या अकरा जणांपैकी नऊ जणांची सुटका करण्यात यश आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाबळेश्वरात धुवांधारगेल्या २४ तासांत राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक २८७ मिमी पावसाची नोंद झाली़ तसेच किनवट १७५, तलासरी १३६, माहूर १२६, भिरा ११०, हरणाई ८९मिमी पाऊस झाला़ घाटमाथावरील कोयना (नवजा) ३४०, दावडी २२०, शिरगाव २०, ताम्हिणी १८०, डुंगरवाडी, कोयना (पोफळी) १४०, खंद १२०, भिरा ११०, अम्बोली १००, लोणावळा ८० मिमी पाऊस झाला़मुसळधार पावसाचा इशारापुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रा,कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.