शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

राज्यात मुसळधार कायम!

By admin | Updated: July 13, 2016 04:12 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पडणारा मुसळधार पाऊस मंगळवारी कायम होता. मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पाऊस झाला

मुंबई/पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पडणारा मुसळधार पाऊस मंगळवारी कायम होता. मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पाऊस झाला. पंचगंगेला पूर आल्याने कोल्हापूरचा शंभराहून अधिक गावांचा तसेच तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आलेआहे. उर्वरित राज्यातही दमदार पाऊस होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली़ कोल्हापूर, सांगली, सातारा भागात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. पंचगंगा नदीने धोक्याची ४३ फुटांची जलपातळी ओलांडली असून महापुराच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. कोल्हापूरचा सुमारे शंभराहून अधिक गावांचा तसेच तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले आहे. सांगलीत कृष्णेचे पाणी पात्राबाहेर पडले. शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून २० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिराळ्यात मोरणा नदीसही पूर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या निफाड आणि दिंडोरी तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या अकरा जणांपैकी नऊ जणांची सुटका करण्यात यश आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाबळेश्वरात धुवांधारगेल्या २४ तासांत राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक २८७ मिमी पावसाची नोंद झाली़ तसेच किनवट १७५, तलासरी १३६, माहूर १२६, भिरा ११०, हरणाई ८९मिमी पाऊस झाला़ घाटमाथावरील कोयना (नवजा) ३४०, दावडी २२०, शिरगाव २०, ताम्हिणी १८०, डुंगरवाडी, कोयना (पोफळी) १४०, खंद १२०, भिरा ११०, अम्बोली १००, लोणावळा ८० मिमी पाऊस झाला़मुसळधार पावसाचा इशारापुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रा,कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.