शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

खतं, बियाण्यांसाठी शेतकऱ्याला 'आधार'सक्ती, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 05:50 IST

सरकारी खतं आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी राज्य सरकारनं आधारकार्ड सक्तीचं केलं आहे. काळाबाजार रोखण्यासाठी घेतला निर्णय...

मुंबई : राज्यात १ नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री फक्त ‘पॉइंट आॅफ सेल’ (पीओएस) मशीनच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच, शेतक-यांना अनुदानित खतांच्या खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी दिली.शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्यात परवानाधारक अनुदानित खत विक्रेत्यांकडील शिल्लक खतांच्या साठ्याचा हिशोब करून त्याची नोंद पीओएसच्या संगणक प्रणालीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील तीन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, राज्यातील २० हजार ९८८ अनुदानित खत वितरकांना मोफत पीओएसचे वाटप करण्यात येईल. खातांच्या खरेदीसाठी किसान क्रेडिट कार्डने मिळालेले एटीएम किंवा इतर एटीएम कार्ड जे शेतक-यांच्या नावे असेल ते वापरता येणार आहे. या प्रणालीमुळे कोणत्या शेतक-याने किती रुपयांचे खत खरेदी केले, याचा रेकॉर्ड ठेवणे सोपे जाणार आहे. पीओएस मशीन म्हणजे एक प्रकारे स्वॅप मशीन आहे. यात स्वॅप मारल्यानंतर तेवढ्या किमतीच्या खरेदीवर शेतक-यांना अनुदान देता येणार आहे, असे फुंडकर यांनी सांगितले.मशीनच्या माध्यमातून खतांची विक्री बंधनकारक करतानाच शेतकºयांसाठी आधार कार्डचीही सक्ती करण्यात आली आहे. खत खरेदीसाठी शेतक-याने दुस-या व्यक्तीस पाठवले तर त्याचाही आधारक्रमांक नोंदविण्यात येणार आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ६० लाख मेट्रिक टन अनुदानित खतांची विक्री होते. खरीप हंगामात ३३ लाख मेट्रिक टन आणि रब्बी हंगामात २७ लाख मेट्रिक टनाची उलाढाल होते. या प्रणालीमुळे लाभार्थ्यांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. तसेच खतांचा दुरुपयोग टाळण्यास मदत होणार असल्याचे फुंडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी