शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खतं, बियाण्यांसाठी शेतकऱ्याला 'आधार'सक्ती, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 05:50 IST

सरकारी खतं आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी राज्य सरकारनं आधारकार्ड सक्तीचं केलं आहे. काळाबाजार रोखण्यासाठी घेतला निर्णय...

मुंबई : राज्यात १ नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री फक्त ‘पॉइंट आॅफ सेल’ (पीओएस) मशीनच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच, शेतक-यांना अनुदानित खतांच्या खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी दिली.शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्यात परवानाधारक अनुदानित खत विक्रेत्यांकडील शिल्लक खतांच्या साठ्याचा हिशोब करून त्याची नोंद पीओएसच्या संगणक प्रणालीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील तीन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, राज्यातील २० हजार ९८८ अनुदानित खत वितरकांना मोफत पीओएसचे वाटप करण्यात येईल. खातांच्या खरेदीसाठी किसान क्रेडिट कार्डने मिळालेले एटीएम किंवा इतर एटीएम कार्ड जे शेतक-यांच्या नावे असेल ते वापरता येणार आहे. या प्रणालीमुळे कोणत्या शेतक-याने किती रुपयांचे खत खरेदी केले, याचा रेकॉर्ड ठेवणे सोपे जाणार आहे. पीओएस मशीन म्हणजे एक प्रकारे स्वॅप मशीन आहे. यात स्वॅप मारल्यानंतर तेवढ्या किमतीच्या खरेदीवर शेतक-यांना अनुदान देता येणार आहे, असे फुंडकर यांनी सांगितले.मशीनच्या माध्यमातून खतांची विक्री बंधनकारक करतानाच शेतकºयांसाठी आधार कार्डचीही सक्ती करण्यात आली आहे. खत खरेदीसाठी शेतक-याने दुस-या व्यक्तीस पाठवले तर त्याचाही आधारक्रमांक नोंदविण्यात येणार आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ६० लाख मेट्रिक टन अनुदानित खतांची विक्री होते. खरीप हंगामात ३३ लाख मेट्रिक टन आणि रब्बी हंगामात २७ लाख मेट्रिक टनाची उलाढाल होते. या प्रणालीमुळे लाभार्थ्यांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. तसेच खतांचा दुरुपयोग टाळण्यास मदत होणार असल्याचे फुंडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी