शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सुधारणा विधेयके राज्य सरकार मागे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 08:23 IST

जनतेची, शेतकरी संघटनेची मते जाणून घेण्यासाठी हे कायदे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ येथे हरकतीही स्वीकारण्यात आल्या होत्या.

अतुल कुलकर्णी - 

मुंबई : शेतकऱ्यांच्या देशभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे या कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करणारी तीन विधेयके राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती. ती विधेयके आता राज्य सरकार परत घेणार आहे. त्यामुळे राज्यात पूर्वीचीच कृषी धोरणे आणि कायदे लागू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून मागील अधिवेशनात शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) सुधारणा कायदा २०२१, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार सुधारणा कायदा २०२१ अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा २०२१ महाराष्ट्र सरकारकडून विधिमंडळात मांडण्यात आले होते. जनतेची, शेतकरी संघटनेची मते जाणून घेण्यासाठी हे कायदे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ येथे हरकतीही स्वीकारण्यात आल्या होत्या. विधिमंडळाकडे हे कायदेदेखील मागे घ्यावेत, अशी निवेदने मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली होती. राज्यभर यानिमित्ताने झालेल्या परिसंवाद आणि चर्चासत्राच्या माध्यमातून कायदेच रद्द करावेत, हा पर्याय समोर आला होता. अधिकच्या हरकती कायदे रद्द करण्याच्या बाजूनेच होत्या.राज्य सरकारने मांडलेल्या सुधारणा विधेयकात बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवण्यात आले होते, फसवणूक झाल्यास शेतकऱ्याला दाद मागण्यासाठी व्यवस्था उभी करून देण्यात आली होती. 

हिवाळी अधिवेशनात विधेयके मागे घेऊ - थोरात कृषी कायदे सुधारणा मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात लोकमतशी बोलताना म्हणाले, आता केंद्र सरकारने हे कायदे रद्द केल्यामुळे राज्य सरकारही आपली सुधारणा विधेयके येत्या अधिवेशनात मागे घेईल. आमचा हेतू शेतकऱ्यांना अधिक बळकट करणे हा होता. आम्ही सुचविलेल्या सुधारणा त्या दृष्टीने पथदर्शक होत्या, पण आता मूळ कायदाच राहिला नाही, तर सुधारणा विधेयकेही ठेवण्यात अर्थ नाही. म्हणून आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात ही विधेयके मागे घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFarmerशेतकरी