शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

एक्स्प्रेस-वे टोल प्रकरणी राज्य सरकारने उत्तर द्यावे, उच्च न्यायालयाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:48 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या कंत्राटदाराला वाहनांकडून टोल आकारण्यास मनाई करावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश सोमवारी दिले.

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या कंत्राटदाराला वाहनांकडून टोल आकारण्यास मनाई करावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश सोमवारी दिले.याचिकेनुसार, राज्य सरकारने २०१५मध्ये छोट्या वाहनांना व एस.टी. बसेसना टोलमधून वगळले. त्याशिवाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरही छोट्या वाहनांना टोलमधून वगळणे शक्य आहे का, याची पडताळणी करण्यासाठी एक समिती सरकारने नियुक्त केली. त्यावर २०१६मध्ये संबंधित समितीने अहवालात म्हटले की, सरकार व कंत्राटदारामध्ये झालेल्या करारानुसार, कंत्राटदाराला टोलद्वारे १,३६२ कोटी रुपये कमाविण्याचा अधिकार आहे. सरकारने कंत्राटदाराला १,३६२ कोटी रुपये द्यावेत व सर्व प्रकारच्या वाहनांची टोलमधून मुक्ती करावी, अशी शिफारस समितीने केली आहे. मात्र, सरकारने या शिफारशीवर विचार करण्यापूर्वीच कंत्राटदाराने टोलद्वारे १५०० कोटी रुपये कमविले आहेत. प्रकल्पाची संपूर्ण रक्कम वसूल होऊनही कंत्राटदार बेकायदेशीररीत्या वाहनचालकांकडून टोल वसूल करत आहे, असे ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्यांच्या अर्जावर तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेCourtन्यायालय