शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

राज्य सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, बीएसपीची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:34 IST

BSP : राज्यात कोरोनाचा भयंकर उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसपीच्या शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शुक्रवारी दुपारी भेट घेतली.

ठळक मुद्दे'राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खाजगीमधील सर्व आरोग्य सेवा अनुदानित करावी.'

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी हवालदिल झाले असून राज्य सरकारने राज्यासाठी १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बीएसपी अध्यक्ष अॅड संदीप ताजने, महासचिव प्रशांत इंगळे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे केली. तसेच, शेतकऱ्याच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा करण्याची मागणी यावेळी केली. (CoronaVirus Lockdown : The state government should announce a package of Rs 10,000 crore, BSP demanded from the governor)

राज्यात कोरोनाचा भयंकर उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसपीच्या शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शुक्रवारी दुपारी भेट घेतली. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापार ठप्प होऊन कामगारांची उपासमार होणार असल्याची चर्चा झाली. संपूर्ण जनता हवालदिल झाली असून आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याची माहिती यावेळी शिष्टमंडळातर्फे बीएसपी प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने, महासचिव प्रा. प्रशांत इंगळे दिली.

याचबरोर, राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खाजगीमधील सर्व आरोग्य सेवा अनुदानित करावी. तसेच आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्याचे उपाय करावे आणि कुणीही उपचाराविना राहणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यात विनावेतन असणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे कुटुंबातील किमान चार सदस्यांना तरी ही मदत मिळावी. आदी मागण्या केल्या आहेत. 

कोरोना तपासणी केंद्र वाढवावे आणि आठ तासाच्या आत मोबाईलवर अहवाल द्यावा. रेमडिसिवर इंजेक्शनची किंमत कमी केल्यानंतरही एमआरपीनुसार वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांना हे इंजेक्शन निशुल्क उपलब्ध करून द्यावे. सरकारने लॉकडाऊन स्थिती तयार केलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय उद्योगधंदे आणि इतर कामे ठप्प आहेत. लोकांकडे पैसे नाहीत त्याकरिता वीज बिल माफ करावे.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, शाळा महाविद्यालयांचे शुल्क माफ करावे, खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बी बियाणे व खते मोफत द्यावे, व्यापारी वर्ग हॉटेल्स व दुकाने यांना संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहण्यास परवानगी द्यावी. दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात विद्यार्थ्यांचे जीव विनाकारण धोक्यात घालू नये. आदी मागण्याचे निवेदन राज्यपाल यांच्याकडे दिल्याची माहिती प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी दिली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस