शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राज्य सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, बीएसपीची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:34 IST

BSP : राज्यात कोरोनाचा भयंकर उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसपीच्या शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शुक्रवारी दुपारी भेट घेतली.

ठळक मुद्दे'राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खाजगीमधील सर्व आरोग्य सेवा अनुदानित करावी.'

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी हवालदिल झाले असून राज्य सरकारने राज्यासाठी १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बीएसपी अध्यक्ष अॅड संदीप ताजने, महासचिव प्रशांत इंगळे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे केली. तसेच, शेतकऱ्याच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा करण्याची मागणी यावेळी केली. (CoronaVirus Lockdown : The state government should announce a package of Rs 10,000 crore, BSP demanded from the governor)

राज्यात कोरोनाचा भयंकर उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसपीच्या शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शुक्रवारी दुपारी भेट घेतली. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापार ठप्प होऊन कामगारांची उपासमार होणार असल्याची चर्चा झाली. संपूर्ण जनता हवालदिल झाली असून आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याची माहिती यावेळी शिष्टमंडळातर्फे बीएसपी प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने, महासचिव प्रा. प्रशांत इंगळे दिली.

याचबरोर, राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खाजगीमधील सर्व आरोग्य सेवा अनुदानित करावी. तसेच आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्याचे उपाय करावे आणि कुणीही उपचाराविना राहणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यात विनावेतन असणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे कुटुंबातील किमान चार सदस्यांना तरी ही मदत मिळावी. आदी मागण्या केल्या आहेत. 

कोरोना तपासणी केंद्र वाढवावे आणि आठ तासाच्या आत मोबाईलवर अहवाल द्यावा. रेमडिसिवर इंजेक्शनची किंमत कमी केल्यानंतरही एमआरपीनुसार वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांना हे इंजेक्शन निशुल्क उपलब्ध करून द्यावे. सरकारने लॉकडाऊन स्थिती तयार केलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय उद्योगधंदे आणि इतर कामे ठप्प आहेत. लोकांकडे पैसे नाहीत त्याकरिता वीज बिल माफ करावे.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, शाळा महाविद्यालयांचे शुल्क माफ करावे, खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बी बियाणे व खते मोफत द्यावे, व्यापारी वर्ग हॉटेल्स व दुकाने यांना संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहण्यास परवानगी द्यावी. दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात विद्यार्थ्यांचे जीव विनाकारण धोक्यात घालू नये. आदी मागण्याचे निवेदन राज्यपाल यांच्याकडे दिल्याची माहिती प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी दिली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस