शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

दारू कारखानेच बंद, तर कसे मिळणार उत्पादन शुल्क?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 05:24 IST

उत्पादनाशिवाय मिळणार नाही विक्रीकरही

- यदु जोशीमुंबई : राज्याचा महसूल वाढावा म्हणून दारूविक्रीची दुकाने सुरू करावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असली तरी केवळ दुकाने सुरू होऊन कुठलाही महसूल राज्य शासनाला मिळत नसतो. त्यासाठी कारखाने सुरू होणे महत्त्वाचे आहे. आजमितीस राज्यात एकही कारखाना सुरू नाही.वितरक जेव्हा दारू कारखान्यांकडून दारू विकत घेतो तेव्हा विक्री केलेल्या दारूवर कारखानदार हे उत्पादन शुल्क आणि विक्रीकर शासनाकडे भरत असतात. त्यामुळे सरकारला दारूपासून उत्पन्न सुरू व्हायचे असेल तर केवळ दारू दुकाने सुरू करून चालणार नाही तर दारूचे कारखानेदेखील सुरू करावे लागणार आहेत. तेव्हा सरकारच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मागणी करायची असेल तर दारू दुकानांबरोबरच दारू कारखानदेखील सुरू करा, अशी करायला हवी.लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणताना सरकारने ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास मुभा दिली असली तरीही ग्रामीण भागातील दारू कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत.उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले की हे कारखाने सुरू करण्याचा विषय स्थानिक जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे. मात्र ते त्यासाठी सहकार्य करीत नसल्याचे दिसते. त्यामुळे कुठेही कारखाने सुरू होऊ शकलेले नाहीत.दारु कारखाने बंद असल्यामुळे शासनाला एप्रिलमध्ये कुठलेही उत्पन्न झालेले नाही. मार्चमध्ये साधारणत: २८०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. १८-२० मार्चपासून कारखाने बंद होऊ लागल्याने केवळ १३०० कोटी रुपये मिळाले. मात्र त्यात मार्चमध्ये जमा होणाºया परवाना शुल्काचा मोठा वाटा होता.दारूपासूनचे राज्य शासनाचे उत्पन्न वाढायचे असेल तर आधी कारखाने सुरू करा. तसे केले तरच उत्पादन शुल्क व विक्रीकर मिळायला सुरुवात होईल.- प्रसन्न मोहिले, अध्यक्ष(कॉपोर्रेट अफेअर्स अ‍ॅण्ड सीएसआर) एबीडी लिमिटेड.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaj Thackerayराज ठाकरे