शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचा पुढाकार, मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयात प्लॅस्टिक बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:09 IST

सहजपणे विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नाने जगभरात गंभीर रूप धारण केले आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

मुंबई - सहजपणे विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नाने जगभरात गंभीर रूप धारण केले आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांच्या वापरावर बंदी घाणल्याचा निर्ण राज्य सरकारने आज घेतल आहे. मंत्रालयात झालेल्या पर्यावरण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. प्लॅस्टिकच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी दुधाच्या, तेलाच्या आणि औषधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांसाठी लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्यासाठी महिला बचत गटांना कापडी पिशव्या तयार करण्यासाठी निधी देणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तरतूद असणार आहे. त्याअंतर्गत 3 ते 6 महिन्यांची शिक्षा आणि दुकानाचा परवाना रद्द करण्याचा  प्रस्तावही राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.  बंदीनंतर दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहे.  संपूर्ण राज्यामध्ये गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सप्टेंबर महिन्यात केली होती. प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, या बाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच महिला बचतगटांनाही अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी त्यांना सबसिडी दिली जाईल. टप्प्याटप्याने राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांनाही प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत सांगण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांना नाविन्यपूर्ण योजनेसाठी दिलेल्या निधीतून काही निधी पर्यावरणपूरक गोष्टीसाठी खर्च करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. आजच्या बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार