शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजवणार, राज्य सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 00:43 IST

सरकारी वकिलांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी माहिती न्यायालयाला मंगळवारी दिली.

मुंबई : सरकारी वकिलांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी माहिती न्यायालयाला मंगळवारी दिली. तसेच पावसाळा संपल्यावर या महामार्गाचे महामार्गाचे क्राँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहितीही मुख्य सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.खड्डेविरहित रस्ते उपलब्ध करून देणे, एवढे तरी किमान राज्य सरकार आपल्या नागरिकांसाठी करू शकते. राज्य सरकारचे ते घटनात्मक कर्तव्य आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. परिणामी, या महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते. त्यामुळे या महामार्गावरील रस्ते दुरुस्त करण्याचे व खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सरकारी वकिलांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी माहिती न्यायालयाला दिली.पावसाळा असल्याने हे खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात येणार नाहीत. पावसाळा संपला की, संपूर्ण महामार्गाचे क्राँक्रिटीकरण करण्यात येईल. हे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाला दिली.खड्डेविरहित रस्ते उपलब्ध करून देणे एवढे तरी किमान सरकार आपल्या नागरिकांसाठी करू शकते, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ७ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.तज्ज्ञांची समिती नियुक्त कराकाँक्रिटायझेशनने पुन्हा-पुन्हा खड्डे होणार नाहीत ना, अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली. दरवर्षीची ही व्यथा आहे. दरवर्षी खड्ड्यांसंदर्भात याचिका दाखल करण्यात येतात आणि आम्ही आदेश देत राहतो. त्याऐवजी तज्ज्ञांची समिती नियुक्त करून खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यासाठी काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का? याचा अभ्यास केला का, अशीही विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली.

टॅग्स :Courtन्यायालय