शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजवणार, राज्य सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 00:43 IST

सरकारी वकिलांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी माहिती न्यायालयाला मंगळवारी दिली.

मुंबई : सरकारी वकिलांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी माहिती न्यायालयाला मंगळवारी दिली. तसेच पावसाळा संपल्यावर या महामार्गाचे महामार्गाचे क्राँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहितीही मुख्य सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.खड्डेविरहित रस्ते उपलब्ध करून देणे, एवढे तरी किमान राज्य सरकार आपल्या नागरिकांसाठी करू शकते. राज्य सरकारचे ते घटनात्मक कर्तव्य आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. परिणामी, या महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते. त्यामुळे या महामार्गावरील रस्ते दुरुस्त करण्याचे व खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सरकारी वकिलांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी माहिती न्यायालयाला दिली.पावसाळा असल्याने हे खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात येणार नाहीत. पावसाळा संपला की, संपूर्ण महामार्गाचे क्राँक्रिटीकरण करण्यात येईल. हे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाला दिली.खड्डेविरहित रस्ते उपलब्ध करून देणे एवढे तरी किमान सरकार आपल्या नागरिकांसाठी करू शकते, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ७ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.तज्ज्ञांची समिती नियुक्त कराकाँक्रिटायझेशनने पुन्हा-पुन्हा खड्डे होणार नाहीत ना, अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली. दरवर्षीची ही व्यथा आहे. दरवर्षी खड्ड्यांसंदर्भात याचिका दाखल करण्यात येतात आणि आम्ही आदेश देत राहतो. त्याऐवजी तज्ज्ञांची समिती नियुक्त करून खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यासाठी काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का? याचा अभ्यास केला का, अशीही विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली.

टॅग्स :Courtन्यायालय