शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लाडकी बहीणमुळे योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद? मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:11 IST

शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीचा निधी बंद करण्याच्या निर्णयावरुन राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले.

Maharashtra Government : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्यात गेल्या काही महिन्यापासून गदारोळ सुरु झालाय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडणार असल्याचा दावा विरोधकांकडून होतोय. अशातच ज्याच्या महसूल व वन विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना दिला जाणारा मदतनिधी देखील बंद केल्याचे वृत्त समोर आलं होतं. राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आल्याचे म्हटलं जात होतं. शिवसेने शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला होता. मात्र आता शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सरकारनं स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने विविध खात्यांमधील निधीत कपात सुरू केल्याचे म्हटलं जात होतं. राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी एक परिपत्रक काढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचे समोर आलं होतं. राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठीच्या तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली. मात्र आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीचा निधी बंद करण्यात आलेल्या आदेशाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचे मंत्रिमंडळाने म्हटलं आहे. तसेचशेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सरकारने म्हटलं आहे.

शिंदे गटाचा विरोध

शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीचा निधी बंद करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना निधी बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ करावी केली जाईल. चुकीची माहिती देऊन काही अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला असेल. सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख महिलांना ४७८७ कोटींचे वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा