शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

कोकणातील अतिवृष्टीबाधितांना राज्य शासनाची अखेर १९ कोटी ३८ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 02:25 IST

ठाण्याचा वाटा सव्वाअकरा कोटींचा ; छोटे व्यापारी, टपरीधारकांना लाभ

नारायण जाधव ठाणे : राज्यात जुलै ते ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांसह अनेक शहरे, गावांतील छोटे व्यापारी, हस्तकला कारागिर, टपरीधारकांसह बारा बलुतेदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांचे पशुधनासह गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. यात कोकणातील ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतही मोठी हानी झालेली आहे. यानुसार कोकण आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार १९ कोटी ३७ लाख ३२ हजार ३२० रुपयांची मदत महसूल व पुनर्वसन विभागाने गेल्या आठवड्यात वितरीत केली आहे. यात सर्वात मोठा हिस्सा ठाणे जिल्ह्याचा आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेली होती. शहरांमध्ये अनेक घरे, चाळी, दुकानांत पाणी शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय शेतीसह शेतकºयांच्या पशुधनासह त्यांच्या गोठ्यांचीही पडझड झाली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीच्या १९ आॅगस्ट २०१९ च्या बैठकीत छोटे उद्योग, गॅरेजचालक, हस्तकला कारागिर, टपरीधारक, घरांच्या पडझडीस गोठ्यांच्या नुकसानीकरिताही मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही १९ कोटी ३७ लाख ३२ हजार ३२० रुपयांची मदत गेल्या आठवड्यात वितरीत करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाकडून ही मदत करण्यात येत असल्याचे महसूल व पुनर्वसन विभागाने म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक मदतकोकणात सर्वात जास्त नुकसान ठाणे जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका,दोन नगरपालिकांच्या क्षेत्रासह ग्रामीण भागातही या काळात मोठे नुकसान झाले होते. ठाणे शहरातील दिवा विभाग,अंबरनाथ-बदलापूर शहरासह ग्रामीण परिसर, उल्हासनगर, कल्याण तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली होती. तसेच शहापूर, मुरबाड, भिवंडीतही काही भागात पुराच्या पाण्यातून काढण्यासाठी एनडीआरएफस नौदल आणि हवाईदलाची मदत घेऊन स्थानिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने नजिकच्या शाळा तसेच हवाईदलाच्या तळावर त्यांची तात्पुरती सोय केली होती. तसेच ग्रामीण भागात गोठ्यांचेही मोठी पडझड झाली होती. यामुळेच ठाणे जिल्ह्याचा या मदतीत ११ कोटी २५ लाख ६८ हजार इतका मोठा वाटा मिळाला आहे.अतिवृष्टी, पुरग्रस्त भागाची पाहणीकेंद्र शासनाच्या पथकानेही दोन दिवस फिरून ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करून आणि त्या त्या जिल्हाधिकाºयांचे सादरीकरण ऐकून घेतले होते. केंद्राची मदत येण्याआधीच राज्य शासनाने ही मदत वितरीत केली आहे.जिल्हानिहाय अशी मिळणार मदतठाणे ११ कोटी २५ लाख ६८ हजारपालघर १६ हजार ८००रायगड दोन कोटी ९७ लाख ३१ हजार ७३५रत्नागिरी चार कोटी ६१ लाख चार हजार ६८५सिंधुदूर्ग ५३ लाख ११ हजार

टॅग्स :Rainपाऊस