शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

महाराष्ट्र बजेट 2019: राज्याचा अर्थसंकल्प २०,२९३ कोटी तुटीचा; शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:48 IST

‘बांधकाम’ला १६ हजार कोटी; गोपीनाथ मुंडे योजनेची व्याप्ती वाढविली

मुंबई : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी एकीकडे लोककल्याणकारी योजनांचा पाऊस पाडताना दुसरीकडे २0,२९२.९४ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता.आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा जलसंपदा विभागासाठी १२,६९७ कोटी रुपये एवढी मोठी तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १६,0२५.५0 कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण असा समन्वय साधत अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा देण्याचाही प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकांमुळे २७ फेब्रुवारी रोजी सरकारने ४,0३,२0७ कोटी एवढ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर केला होता. आज १,५८६ कोटींची वाढ त्यात करण्यात आली. सरकारला विविध उत्पन्नाद्वारे ३,१४,६४0.१२ कोटी मिळतील आणि ३,३४,९३३.0६ कोटी खर्च होतील. अर्थसंकल्प सादर करतानाची तूट २0,२९२.९४ कोटी आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांत १५१ तालुक्यांतील १७,९८५ गावांमधील शेतकऱ्यांना ४,४६५ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून त्याचा फायदा ६६,८८,४२२ शेतकºयांना झाल्याची माहिती देत हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकºयांना समर्पित असल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी २,७२0 कोटी, बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी १,५३१ कोटी, मागेल त्याला शेततळे योजनेसाठी १२५ कोटी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य अभिसरण आराखड्याकरिता व २८ प्रकारच्या कामांच्या कुशल खर्चासाठी ३00 कोटी रुपये, सूक्ष्म सिंचनासाठी ३५0 कोटी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी २१0 कोटी, कृषी विद्यापिठे आणि नवीन कृषी महाविद्यालयांसाठी २00 कोटी, गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १00 कोटी, महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी २,२२0 कोटी, काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी १00 कोटी, फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी १६.७४ कोटी, गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी ३४.७५ कोटी, अटल अर्थसहाय्य योजनेसाठी ५00 कोटी अशी शेतकºयांसाठी ८,४0७.४९ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आता शेतकºयांच्या कुटुंबीयांनाही लागू राहील.राज्य शासनाने २0१६-१७ पासून एनएसएसएफमधून कर्ज घेणे पूर्णत: बंद केले असले तरी २0१८-१९ अखेर एकूण कर्ज ४,१४,४११ कोटी एवढे असून त्यापैकी बाजार कर्जाचे प्रमाण ६२ टक्के आहे.मात्र, हे कर्ज निकषांच्या मर्यादेतच असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.अशी आहे विविध खात्यांची तरतूदकृषी व संलग्न कार्यक्रमासाठी १६,१७९.२५ कोटी, ग्रामविकासाठी १६,0९५.१८ कोटी, ऊर्जा विभागासाठी ८,४१0.९५ कोटी, वाहतूक व दळणवळणासाठी ७,१२४.0१ कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती ७,२0६.५0 कोटी, आरोग्य व कुटुंबकल्याण विभागासाठी १४,८१0.३७ कोटी, पाणीपुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण व नगरविकास या विभागांसाठी २९,४३९ कोटी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक विभागासाठी १७,८८४.५४ कोटी, कामगार व कामगार कल्याणासाठी १,४४१.६९ कोटी, समाजकल्याण व पोषण आहार यासाठी १३,३६२.३२ कोटी तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Maharashtraमहाराष्ट्र