शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

प्रदेश भाजपाचा कारभार तुटलेल्या कार्यालयातूनच

By admin | Updated: January 15, 2017 03:23 IST

राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच, भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉर्इंट येथील प्रदेश मुख्यालयाला

मुंबई : राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच, भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉर्इंट येथील प्रदेश मुख्यालयाला मात्र सध्या अवकळा आली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त कार्यालय न्यायालयाच्या आदेशानुसार पाडले आहे. उरलेल्या भागात प्रदेश मुख्यालय कसेबसे तग धरून आहे. कार्यालयाचा दर्शनी भाग पूर्वीसारखाच असला तरी मागचे सगळे बांधकाम पाडण्यात आले आहे. हे बांधकाम अवैध असल्याचे सांगत नरिमन पॉइंट रहिवासी संघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ते पाडण्याची मागणी केली होती. भाजपा कार्यालयाच्या मूळ जागेव्यतिरिक्तची ३० मीटरची जागा अवैधरीत्या कब्जात घेऊन हे बांधकाम करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. ते न्यायालयाने ग्राह्य धरले आणि भाजपाने हे अवैध बांधकाम पाडावे, असे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करीत महापालिकेकडून कारवाई होण्याच्या आत स्वत: भाजपानेच ते बांधकाम पाडले. त्यामुळे सध्या राज्यात नंबर वनवर असलेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे ‘बुरे हाल’ आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी हे कार्यालय आलिशान बांधण्यात आले होते. शंभरएक लोक बसू शकतील, असे छोटेखानी एसी सभागृह होते. पूर्वी वरच्या माळ्यावर गुप्त बैठकी चालायच्या. लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यालयाची मात्र रया गेली आहे. कार्यालयातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही दक्षिण मुंबईतच मोठ्या कार्यालयासाठी जागा शोधत आहोत. दोन-तीन जागाही निवडलेल्या आहेत, पण कुठल्या एका जागेचे अद्याप नक्की झालेले नाही. (विशेष प्रतिनिधी)