शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

राज्यात ५ हजार किडनी, तर १ हजार जण यकृताच्या प्रतीक्षेत; एक देहदान अनेकांसाठी जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 02:50 IST

अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी वाढली : ८९ जणांना हवे हृदय, तर ४८ जणांना स्वादुपिंड

दीपक शिंदेसातारा : मानवासाठी प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. मृत्यूनंतर आपला अवयव एखाद्याच्या जीवनाला उभारी देणारा ठरला तर जीवन सार्थक होईल. सध्या राज्यात ५ हजार ४८७  जणांना किडनीची, तर १०९५ जणांनी यकृताची आवश्यकता आहे. १९ जण फुप्फुसाच्या, तर ८९ जण हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. आज नाही तर उद्या एखादा अवयव मिळेल म्हणून अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात चकरा मारतात. 

दररोज उगवणारा दिवस अनेक पालकांसाठी नवी आशा घेऊन उगवत असतो. आज नाही तर उद्या अवयव मिळेल या प्रतीक्षेत अनेक जण आहेत. रुग्णालयातून आपल्या नातेवाइकाला अवयव मिळाला असा निरोप येण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत; पण आपल्या समाजात देहदानाऐवजी मृत्यूनंतर पंचतत्त्वात विलीन करण्याकडे अधिक कल आहे. आपले एक देहदान अनेकांसाठी जीवनदान असते याचा विचार होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. 

मृत व्यक्तीचे सर्वच अवयव उपयोगी येतात असे नाही. मात्र, अपघातामध्ये एखादी व्यक्ती गंभीर जखमी होऊन तिचा मेंदू मृत झाला तर तिच्या पालकांच्या संमतीने त्या व्यक्तीचे अवयव इतरांसाठी वरदान ठरू शकतात.  अवयव दानामध्येही रक्तगट जुळणे आणि अवयव जुळणे महत्त्वाचे असते. त्याबरोबरच याठिकाणी कोणताही वशिला उपयोगाचा ठरत नाही. त्यामुळे सरकारी प्रतीक्षा यादीनुसार अवयव आवश्यक असलेल्या व्यक्तीला ते दिले जातात. एखादी व्यक्ती खरंच अंतिम स्टेजवर असेल तरच त्याचा प्राधान्यक्रम लागतो. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होत असते. तोपर्यंत अनेकांना अवयवाच्या प्रतीक्षेत जीवही गमवावा लागतो. त्यासाठी अवयवदान ही एक चळवळ होणे आवश्यक आहे. काही सामाजिक संस्था यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांना समाजाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. 

अवयव प्रत्यारोपनापूर्वी आणि प्रत्यारोपनानंतर दोन्ही वेळेस रुग्णांची मानसिक तयारी करावी लागते. जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याला काही अंशी यशही येत आहे. तरीदेखील राज्य आणि देशभरात अनेक ठिकाणी अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते.  - धीरज गोडसे, संस्थापक,  कोमल न्यू लाइफ फाउंडेशन, सातारा 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल